शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

अखेर आरक्षण उठविण्याचा, पदोन्नतीचा ‘तो’ ठराव रद्द

By admin | Updated: December 23, 2014 00:58 IST

औरंगाबाद : महापालिका व शहरात मागील पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दोन वादग्रस्त विषयांवर आज सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

 

औरंगाबाद : महापालिका व शहरात मागील पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दोन वादग्रस्त विषयांवर आज सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. क्रांतीचौक येथील आरक्षित भूखंड क्रमांक १७३५५ वरील आरक्षण उठविण्याचा ठराव रद्द करण्यात आला. तसेच कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांना सहायक संचालक नगररचना या पदावर पदोन्नतीचा ठराव रद्द करण्याचे आदेश महापौर कला ओझा यांनी दिले. ते दोन विषय वगळता बाकीच्या इतिवृत्तास मंजुरी देत महापौरांनी विषयपत्रिका चर्चेला येण्यापूर्वीच सभा तहकूब केली. २७ डिसेंबरपर्यंत ही तहकूब सभा घेण्यात येणार आहे. सभा संपल्याचे महापौरांनी राष्ट्रगीत न घेताच जाहीर केले. त्यामुळे सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. नगरसचिव एम. ए. पठाण यांनी सभा तहकूब केल्याचे १० मिनिटांनी जाहीर केले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेत आता सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सभेत मनमानी केल्यामुळे शिवसेनेवर भाजपासह सर्वच पक्षांनी टीकास्त्र सोडले. ४ क्रांतीचौक येथील नगर भूमापन क्रमांक १७३५५ या मिळकतीवर २००२ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार पार्किंग, उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ते आरक्षण उठविण्याचे, तसेच सहा. संचालक या पदावर डी. पी. कुलकर्णी यांना पदोन्नती देण्याच्या ठरावाचे इतिवृत्त क्र.६६५, ६६६ वर होते. ते दोन्ही ठराव वगळून इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. ४११ नोव्हेंबरच्या सभेत वरील दोन्ही ठराव ऐनवेळी घुसवून मंजूर करण्यात आले होते. क्रांतीचौकच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी सूचक सूर्यकांत जायभाये, अशोक बेहडे, सभापती विजय वाघचौरे यांनी ठराव रद्द करण्यासाठी महापौरांना पत्र दिले आहे. कुलकर्णी यांचा ठराव राजू वैद्य, समीर राजूरकर यांनी मांडला होता. १ महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्याकडे मनपाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही सभापूर्व बैठका घेऊन त्यांनी रणनीती आखली. मात्र, त्याचा काहीही परिणाम सभेच्या कामकाजावर झाला नाही. पक्षप्रमुख ठाकरे यांनी जैस्वालांकडे मनपाची सूत्रे दिलेली असताना उपनेत्यांची मनपा सभेवर पकड कायम असल्याचे स्पष्ट झाले. २ कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांना पदोन्नती देण्यास खा.चंद्रकांत खैरे यांचा विरोध होता. कारण त्यांनी कुलकर्णी यांची १०० पानी तक्रार गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्रांतीचौक येथील आरक्षित भूखंड प्रकरणात अपेक्षित अर्थकारण झाले नाही. त्यामुळे तो ठरावही रद्द करण्यासाठी दबाव आणला गेला. मुळात ते दोन्ही ठराव शिवसेनेच्या सदस्यांनी मांडले होते. परंतु अपेक्षित हेतू साध्य न झाल्यामुळे दोन्ही ठराव रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.