शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

पंधरा दिवसांत बेचाळीस शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात गेल्या पंधरा दिवसांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे

 

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात गेल्या पंधरा दिवसांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४ आणि नांदेड जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच सरलेल्या वर्षात मराठवाड्यात ५११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आता नवीन वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. दुष्काळामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले. रबी पिकांची पेरणीही झाली नाही. दोन्ही पिके हातची गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने वैयक्तिक मदत जाहीर केली असली तरी ही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे नवीन वर्षातही अनेक शेतकरी कंटाळून आत्महत्या करीत आहेत. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. ही रक्कम नेमकी कुठे जात आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे.