शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून मिळते हजार जणांना दोन वेळचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:04 IST

-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कारागृहातील कैद्यांना पॅरोल दिला आहे. हे कारागीर कैदी अद्याप परतले नाहीत ...

-साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कारागृहातील कैद्यांना पॅरोल दिला आहे. हे कारागीर कैदी अद्याप परतले नाहीत त्यामुळे उद्योग विभाग सध्या बंद आहे. मात्र पैठणच्या खुल्या कारागृहातील शेती उद्योग मात्र सुरू आहे. तोच भाजीपाला कारागृहात किचनमध्ये शिजवला जातो. हजारो जणांचे दोन वेळचे जेवण त्यातून तयार होते.

कारागृहात कैद्यांमार्फत तयार करण्यात येणारे फर्निचर, कापड आणि त्यापासून विविध प्रकारचे तयार कपडे, लोखंडी साहित्य, घर सजावटीच्या वस्तू यास मोठा ग्राहक आहे. परंतु कोरोनामुळे सर्वच कारागृहातील इंडस्ट्री शासनाने बंद केलेली असून कैद्यांना पॅरोल दिला आहे.

पैठणच्या खुले कारागृहातील कृषी उद्योग, व्यवसाय जोरात सुरू असून येथे जवळपास ४० कैदी कामावर आहेत. त्यांच्यामार्फत शेतीतून पिकविण्यात येणारा भाजीपाला कारागृहात किचनमध्ये पाठवला जातो. इतर कैदी पॅरोलवर गेले असून ते अद्याप परतलेले नाहीत.

-जिल्हा कारागृहात एकूण कैदी

१,१५९

-पॅरोलवर गेले कैदी

७००

-पॅरोलवर नको रे बाबा!

कोरोना काळात उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले. शासनाने लादलेल्या नियमामुळे बहुतांश कैदी पॅरोलवर गेले आहे. पण शेती व्यवसाय करणारे कैदी कामावर असून त्यांचे शेती व्यवसाय कामे त्याप्रमाणे सुरळीत सुरू आहे.

-काय काय बनवले जात होते

-लाकडी फर्निचरचे उत्कृष्ट साहित्य

-लोखंडापासून तयार करण्यात येणारे अवजारे

-कापडी बॅग, सतरंजी, इतर कापडी तयार कपडे

-घर सजावटीच्या वस्तू

-कागदी फाईल फोल्डर

कोरोना काळात उत्पन्न बुडाले...

कोरोना उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कारागृहातील उद्योग व्यवसायातून कैद्यांना मिळणारा रोजगार बुडाला आहे. तर दुसरीकडे शेती व्यवसायातून जेमतेम उत्पन्न सुरू आहे त्यातून किती फायदा झाला हे सांगता येत नाही.

कारागृह प्रमुखाचा कोट..

शेती व्यवसाय आमच्याकडे नाही, परंतु कारागृहातील उद्योग इंडस्ट्री सर्व बंद असून गेलेले कैदी कडक नियमामुळे त्यांच्या रजा वाढत आहेत. कुशल कारागीर असलेले कैदी शासनाने दिलेल्या आदेशानंतर परत येतील. उद्योग व्यवसाय तेव्हा सुरू होईल. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूला शहरातून चांगली मागणी आहे.

-जयंत नाईक (मध्यवर्ती कारागृह प्रमुख, औरंगाबाद)

(डमी स्टार ९१०)