शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

तारण योजनेबद्दल शेतकरी संभ्रमात

By admin | Updated: October 30, 2014 00:26 IST

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीकडून पुरेशी माहिती पोहोचत

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीकडून पुरेशी माहिती पोहोचत नसल्याने शेतकरी या योजनेबाबत संभ्रमात आहेत.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेपर्यंत माल बाजार समितीत ठेवून त्यावर नाममात्र व्याजदर आकारून शेतकऱ्यांना मालावर तारण कर्ज देण्याची शासनाची योजना आहे. परंतु त्यासाठी शासनाच्या अनेक जाचक अटी आणि क्लिष्ट पद्धतींमुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्याऐवजी आपला माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकतात. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्यांना शेती उत्पन्नासंबंधी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एक वर्ष दुष्काळ तर मागील वर्षी गारपिट यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात मोठी घट आली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पन्न घटणार आहे. एकीकडे शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्यांना तारण कर्ज देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मागणी केलेल्या १ कोटींच्या कर्ज रक्कमेपैकी २५ लाखांची रक्कम मिळाली. परंतु अचानक पणन महामंडळाने ही योजना स्टार कृषी या कंपनीमार्फत चालविण्याचे आदेश दिल्याने त्यापुढे बाजार अद्याप बाजार समितीला मिळाले नाही. तारण कर्ज योजनेबद्दल काहीच माहिती बाजार समितीकडून मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने माल विक्री केला. (प्रतिनिधी)२०१२-१३ या वर्षात राज्य शासनाने तारण पीककर्ज योजना स्टार कृषी कंपनीकडे हस्तांतरण करण्याच्या सूचना आम्हाला मिळाल्या. शासनाकडून १ कोटींपैकी २५ लाखांची रक्कम प्राप्त झाली होती. मात्र त्याचे वितरण झाले नसल्याची माहिती पणन महामंडळाच्या सूत्रांनी दिली.