शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्याने केले स्वखर्चातून बंधाऱ्याचे काम

By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST

गणेश लोंढे, राणी उंचेगाव पाण्याचे महत्त्व कळले अन् या जाणिवेतून भविष्यकाळात अशा समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे.

गणेश लोंढे, राणी उंचेगावदुष्काळी परिस्थितीची भयानक दाहकता अनुभवल्यानंतर पाण्याचे महत्त्व कळले अन् या जाणिवेतून भविष्यकाळात अशा समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे.घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील फळबागधारक शेतकरी रामेश्वर शिवतारे यांच्या गटक्रमांक ९९ या क्षेत्रामधून नाला गेलेला आहे. या नाल्याची जेसीबी यंत्राच्या साह्याने दोन्ही बाजूने रूंदी, खोली आणि उंची योग्य प्रकारे करून या नालयावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नाल्यावर १२० मीटर लांब, ५ मीटर उंच आणि ६ मीटर रूंद या आकाराचा सिमेंट बंधारा तयार करण्याचे काम शासनाच्या कोणत्याही योजनेची आशा न बाळगता सुरू केले आहे.मागील वर्षी पडलेल्या भयंकर दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी फळबागा जळाल्या होत्या. या परिस्थितीमध्ये शिवतारे यांची देखील दोन हेक्टरवरील मोसंबीची बाग पाण्याअभावी तोडून फेकावी लागली होती. या दुष्काळी परिस्थितीचा अनुभव आल्यानंतर शेतामधील नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेऊन भविष्यामध्ये सिंचनाची एक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.या सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढण्याचे काम नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर कापूस, गहू, ज्वारी, हरभरा अशा पिकांच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून अशा प्रकारचे नाले, ओढे गेलेली असतील अशा शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेसाठी आणि जमिनीमधील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या सिमेंट बंधाऱ्याची, माती बंधाऱ्याची उपाययोजना कराव्यात, असे शिवतारे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी विभाग गाढ झोपेतशेतकरी दुष्काळी परिस्थितीमध्ये होरपळतात आणि सावरतात परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची मानसिकता कृषी विभागाची राहिलेली नाही. सिमेंट बंधारे, माती बंधारे, साखळी सिमेंट बंधारे अशी सिंचनाची महत्त्वाची कामे गतिमान झालेली नाही. यामुळेच शेतकऱ्यांना अनेक समस्येला तोंड देवून प्रसंगी कर्जबाजारी होऊन शेतीच्या सिंचनाच्या सुविधा स्वखर्चातून हाती घेण्याची वेळ आली आहे.