शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

शेतकरी महिलांच्या सशक्तीकरणाची गरज

By admin | Updated: March 11, 2017 00:23 IST

उस्मानाबाद : शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी व्यक्त केले़ ‘

उस्मानाबाद : जमिनीचे आणि सर्वसामान्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती पध्दतीची गरज आहे़ हे काम महिला योग्यप्रकारे करू शकतात म्हणून शेतकरी महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़ ‘व्हेली’सेंटरच्या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक नेतृत्व विकसित करण्यावरही भर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़स्वयम् शिक्षण प्रयोगच्या वतीने शहरातील आनंदनगर भागातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानिमित्त त्या आल्या होत्या़ यावेळी ‘लोकमत’शी वार्तालाप करताना प्रेमा गोपालन् म्हणाल्या, १९९३ च्या भूकंपानंतर आमच्या संस्थेने काम सुरू केले़ महिलांच सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन आजवर उस्मानाबादसह लातूर, बीड, वाशीम, सोलापूर व नांदेड जिल्ह्यात पाच हजारापेक्षा जास्त बचतगट तयार करण्यात आले असून, या अंतर्गत एक लाखाच्या जवळपास महिला जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात महिलांकडे शेतकरी म्हणून न पाहता एक मजूर म्हणून पाहिले जाते़ ही बाब पाहता आम्ही त्या शेतकरी महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम सुरू केले़ त्यांच्या शेतातील एक ते दोन एकर जमीन स्वत:च्या निर्णय क्षमतेवर कसण्यासाठी घेण्याची अट घालून त्यांना शेती कसण्यासाठी पुढे आणले आहे़ एका हंगामात एकच पीक न घेता घरात लागणारे अन्नधान्य, भाजीपाला घेण्याबाबत सूचित केले आहे़ आजवर राज्यात अशा प्रकारे सात हजार महिलांनी स्वत: शेती कसण्यासाठी घेतली असून, त्यामुळे कुटुंबातील अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत़ रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे़ त्यामुळे आम्ही सेंद्रीय शेतीकडे महिलांना वळविले आहे़ सेंद्रीय शेतीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळून विषमुक्त अन्नधान्यही मिळणार आहे़ दुष्काळी परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० महिलांना सोबत घेऊन प्रशासनाने ३०० गावात काम केले आहे़ शासकीय योजना शेतकरी, शेतमजुरांपर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे, दरडोई उत्पन्न वाढवून होणारे स्थलांतर रोखण्याचे यशस्वी कामही करण्यात आले आहे़ महिलांना सोबत घेऊन राबविलेल्या योजनांचा प्रयोग हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरल्याचेही त्यांनी सांगितले़उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार ‘व्हेली’ सेंटर सुरू करण्यात आले आहेत़ त्याशिवाय ‘एसएसबी’ सेंटर ही सुरू करणार आहोत़ या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व गुणांना वाव देऊन त्यांना प्रगल्भ बनविण्यात येणार आहे़ पुढील तीन वर्षात देशात ५०० सेंटर सुरू करून एक लाख महिलांमधील नेतृत्वाला वाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगत, महिलांच्या विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य असल्याचे त्या म्हणाल्या.