शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महिलांच्या सशक्तीकरणाची गरज

By admin | Updated: March 11, 2017 00:23 IST

उस्मानाबाद : शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी व्यक्त केले़ ‘

उस्मानाबाद : जमिनीचे आणि सर्वसामान्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती पध्दतीची गरज आहे़ हे काम महिला योग्यप्रकारे करू शकतात म्हणून शेतकरी महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़ ‘व्हेली’सेंटरच्या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक नेतृत्व विकसित करण्यावरही भर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़स्वयम् शिक्षण प्रयोगच्या वतीने शहरातील आनंदनगर भागातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानिमित्त त्या आल्या होत्या़ यावेळी ‘लोकमत’शी वार्तालाप करताना प्रेमा गोपालन् म्हणाल्या, १९९३ च्या भूकंपानंतर आमच्या संस्थेने काम सुरू केले़ महिलांच सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन आजवर उस्मानाबादसह लातूर, बीड, वाशीम, सोलापूर व नांदेड जिल्ह्यात पाच हजारापेक्षा जास्त बचतगट तयार करण्यात आले असून, या अंतर्गत एक लाखाच्या जवळपास महिला जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात महिलांकडे शेतकरी म्हणून न पाहता एक मजूर म्हणून पाहिले जाते़ ही बाब पाहता आम्ही त्या शेतकरी महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम सुरू केले़ त्यांच्या शेतातील एक ते दोन एकर जमीन स्वत:च्या निर्णय क्षमतेवर कसण्यासाठी घेण्याची अट घालून त्यांना शेती कसण्यासाठी पुढे आणले आहे़ एका हंगामात एकच पीक न घेता घरात लागणारे अन्नधान्य, भाजीपाला घेण्याबाबत सूचित केले आहे़ आजवर राज्यात अशा प्रकारे सात हजार महिलांनी स्वत: शेती कसण्यासाठी घेतली असून, त्यामुळे कुटुंबातील अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत़ रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे़ त्यामुळे आम्ही सेंद्रीय शेतीकडे महिलांना वळविले आहे़ सेंद्रीय शेतीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळून विषमुक्त अन्नधान्यही मिळणार आहे़ दुष्काळी परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० महिलांना सोबत घेऊन प्रशासनाने ३०० गावात काम केले आहे़ शासकीय योजना शेतकरी, शेतमजुरांपर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे, दरडोई उत्पन्न वाढवून होणारे स्थलांतर रोखण्याचे यशस्वी कामही करण्यात आले आहे़ महिलांना सोबत घेऊन राबविलेल्या योजनांचा प्रयोग हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरल्याचेही त्यांनी सांगितले़उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार ‘व्हेली’ सेंटर सुरू करण्यात आले आहेत़ त्याशिवाय ‘एसएसबी’ सेंटर ही सुरू करणार आहोत़ या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व गुणांना वाव देऊन त्यांना प्रगल्भ बनविण्यात येणार आहे़ पुढील तीन वर्षात देशात ५०० सेंटर सुरू करून एक लाख महिलांमधील नेतृत्वाला वाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगत, महिलांच्या विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य असल्याचे त्या म्हणाल्या.