शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी

By बापू सोळुंके | Updated: December 2, 2023 19:18 IST

दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर येथे आजपासून मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे. ग्रामीण भागातील प्रादेशिक संमेलनाची साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृती मागे पडत असल्याची चर्चा होत असते. असे असले तरी दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. वाचकांना दर्जेदार कथा, कादंबऱ्या आणि कविताही वाचायला आवडतात. तसेच माहितीपर पुस्तकांचीही चोखंदळ वाचकांकडून मागणी असते, असेही लेखक, प्रकाशकांनी नमूद केले.

ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्रीसोशल मीडियामुळे पुस्तके वाचली जात नाही, असा भ्रम आहे. उलट सोशल मीडियामुळे पुस्तके विकली जातात आणि वाचलीही जातात. पारंपरिक पुस्तकांसोबतच आता शेअर मार्केटची माहिती देणाऱ्यांसारख्या माहितीपूर पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पूर्वी केवळ पुस्तक प्रकाशनातच पुस्तकांची विक्री होत होती. आता ॲमेझॉनसारख्या ई कॉमर्स प्लॉटफार्मवरूनही पुस्तकांची विक्री होते. साहित्य संमेलनात आम्ही पुस्तक विक्रीचे दोन स्टॉल घेतले आहे.- साकेत भांड, संचालक, साकेत प्रकाशन.

विक्री घटण्याचे कारण वाढलेल्या किमतीगंगापूर येथे होत असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात आम्ही तीन स्टॉल लावत आहोत. उद्या किती खरोखरच कमी झाली आहे. आजकाल पुस्तकांचे वाचन आणि विक्री फार खरोखरच कमी झाली आहे. ऑनलाइन विक्री होते, असे म्हटले जाते, पण ऑनलाइन विक्रीचे प्रमाण केवळ एक ते दीड टक्का आहे. पुस्तक विक्री घटण्याचे कारण पुस्तकाच्या वाढलेल्या किमती हे एक आहे. लेखक, कवींना स्वत:ची पुस्तके इतरांनी वाचावी, असे वाटते, पण ते इतरांची पुस्तके विकत घेऊन वाचत नाही, ही शोकांतिका आहे.-कुंडलिक अतकरे, अध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद.

अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली वाचकांना केंद्रबिंदू ठेवून प्रकाशकाने दर्जेदार लेखक शोधून आणि त्यांची पुस्तके छापली तर अशा पुस्तकांचे वाचकांकडून स्वागत होते. आजकाल मात्र हौशी लेखकांची पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा पुस्तकांना वाचकांकडून मागणी नसते. मात्र आजही जुन्या लेखकांच्या कथा, कादंबऱ्यांना वाचकांची मागणी आहे. शिवाय देश, विदेशातील बेस्ट सेलर पुस्तकांचा अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली आहे. ऑनलाइनही विक्री चांगल्या प्रकारे होते. दर्जेदार पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी एकत्र येऊन चळवळ निर्माण करणे गरजचे आहे.- विलास फुटाणे, संचालक, आदित्य प्रकाशन.

वाचक नावीन्यपूर्ण लेखनाच्या शोधातलेखक जी निर्मिती करतो, ती वास्तव जीवनातील संवेदनशीलतेने केलेली असेल तर वाचक त्यात गुंतून पडतो. विषय सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक असो, त्या विषयाची अभिव्यक्ती करताना, लेखक ज्या पद्धतीने करतो ती इतरांपेक्षा वेगळी असेल तर वाचक त्या लेखनात गुंतून पडतो. मग ती कथा असो, कादंबरी असो किंवा कविता असो. या सर्व लेखनाविषयी वाचकाच्या मनात प्रेम निर्माण होते आणि तो अशा नावीन्यपूर्ण लेखनाच्या आणि लेखकाच्या सतत शोधात असतो. मग अशी पुस्तके तो विकत घेऊनसुद्धा वाचत असतो.- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद.

समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्नवाचनसंस्कृती नामशेष झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. साहित्य संमेलनात पुस्तके विकत घेतली जातात आणि ती वाचली जातात. जी प्रादेशिक संमेलने आहेत, त्या प्रादेशिक संमेलनात आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी पुस्तके विकत घेतली जातात, तीही वाचण्यासाठीच घेतली जातात. त्या लेखकाचा एक वाचकवर्ग तयार झालेला असतो. हा वाचक वर्ग केवळ कविता, कथा एवढ्यापुरता मर्यादित नाही. समीक्षा, संशोधन, वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाकडेही वाचक आकृष्ट झालेला असतो. म्हणून समाज, संस्कृती, साहित्य याची अभिरुचीदेखील संपन्नच होत आली आहे.- डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्यिक.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद