शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पॅकेजच्या घोषणेनंतरही हालचाल शून्य

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

औरंगाबाद : भीषण दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली.

औरंगाबाद : भीषण दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली. केंद्राचे पथकही धावता दौरा करून गेले; पण अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. मराठवाड्यातील तब्बल ४३ लाख शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे शासनाने मदत जाहीर केली असली तरी नेमकी किती मदत मिळणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे. संपूर्ण मराठवाडा यंदा भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाअभावी विभागातील खरीप पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा केली. मराठवाडा आणि इतर विभागातील एकूण १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी नुकसानभरपाई म्हणून ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद पॅकेजमध्ये केली आहे. यानंतर विभागात केंद्राचे पथकही पाहणी करून गेले; परंतु हे सर्व झाल्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पदरात पडलेली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार आणि ती किती हेक्टरच्या मर्यादेत मिळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विभागातील शेतकरी अजूनही चिंतेतच आहे. विभागात यंदा रबीचाही पेरा होऊ शकलेला नाही. खरीप गेले, रबीही गेली अशा अवस्थेत शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठवाड्यात यंदा ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. या सर्व क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ४३ लाख शेतकरी असून, हे सर्व शेतकरी मदतीसाठी डोळे लावून बसले आहेत.