शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पॅकेजच्या घोषणेनंतरही हालचाल शून्य

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

औरंगाबाद : भीषण दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली.

औरंगाबाद : भीषण दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली. केंद्राचे पथकही धावता दौरा करून गेले; पण अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. मराठवाड्यातील तब्बल ४३ लाख शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे शासनाने मदत जाहीर केली असली तरी नेमकी किती मदत मिळणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे. संपूर्ण मराठवाडा यंदा भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाअभावी विभागातील खरीप पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा केली. मराठवाडा आणि इतर विभागातील एकूण १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी नुकसानभरपाई म्हणून ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद पॅकेजमध्ये केली आहे. यानंतर विभागात केंद्राचे पथकही पाहणी करून गेले; परंतु हे सर्व झाल्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पदरात पडलेली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार आणि ती किती हेक्टरच्या मर्यादेत मिळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विभागातील शेतकरी अजूनही चिंतेतच आहे. विभागात यंदा रबीचाही पेरा होऊ शकलेला नाही. खरीप गेले, रबीही गेली अशा अवस्थेत शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठवाड्यात यंदा ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. या सर्व क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ४३ लाख शेतकरी असून, हे सर्व शेतकरी मदतीसाठी डोळे लावून बसले आहेत.