शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

३५० लोकसंख्येच्या वसाहतींनाही आता ग्रामपंचायतीचा दर्जा

By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST

संजय तिपाले , बीड विविध प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या गावांच्या वसाहतींना विकासाच्या मुुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल केला जाणार आहे़

संजय तिपाले , बीडविविध प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या गावांच्या वसाहतींना विकासाच्या मुुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल केला जाणार आहे़ त्यासाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्यात आली असून ३५० लोकसंख्येच्या वसाहतीतही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण होणार आहे़ प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे़पाटबंधारे विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे अनेक गावे पुनर्वसित झाली़ अशा पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी तेथे स्वतंत्र ग्रामपंचायती सुरु करण्याचा निर्णय राज्य ग्रामपंचायत अधिनियम कलम ४ अन्वये घेण्यात आला आहे़ स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी सध्या दोन हजार लोकसंख्येची अट आहे़ पुनर्वसित गावांतील वसाहतींसाठी लोकसंख्येची अट केवळ ३५० इतकी आहे़ प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या ३५० ते १००० लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण होणार असल्याने या वसाहती विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे़ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एस़ एस़ संधू यांनी याबाबतचे पत्र ३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला पाठविले आहे़ पुनर्वसित गावांची माहिती पंचायत विभागाकडून शासनाला कळविण्यात येणार आहे़ त्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल़माहिती कळविणारग्रामविकास विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे़ गटविकास अधिकाऱ्यांकडून पुनर्वसित गावांची माहिती मागविण्यात येईल़ ३५० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वसाहती किती आहेत? हे देखील पहावे लागेल़ ही सर्व माहिती शासनाला कळविण्यात येईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ग्रामपंचायतींची संख्या वाढणारपंचायत विभागातील सूत्रांनुसार जिल्ह्यात पुर्नवसित ग्रामपंचायतींचा आकडा ७० हून अधिक आहे़३५० लोकसंख्या असलेल्या बहुतांश वसाहती गेवराई व माजलगाव या तालुक्यात आहेत़ सध्या जिल्ह्यात १०२४ ग्रामपंचायती आहेत़ पुनर्वसित वसाहतींना ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाला तर एकूण ग्रामपंचायतींची संख्या १०५० च्या घरात पोहोचू शकते़प्रकल्पग्रस्तांना दिलासाग्रामविकास विभागाने मागविली माहितीजिल्हा परिषदेला आले पत्रपंचायत विभागाकडून प्रकल्पग्रस्त व पुनर्वसित वसाहतींची माहिती काढणे सुरु