शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

दलालांकडून प्रवासी पळविणे अद्याप सुरूच

By admin | Updated: August 4, 2014 01:55 IST

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे; परंतु अभियान सुरू असतानाही प्रवाशांना पळविण्याचा प्रकार सुरूच आहे. एकीकडे शिवनेरीच्या फेऱ्या रद्द केल्याने, तर दुसरीकडे दलालांकडे दुर्लक्ष होत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी पळविले जात आहेत.औरंगाबाद- पुणे मार्गावर ११ शिवनेरी बस धावतात; मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिवनेरी बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असून हा प्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी ८, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजेच्या अशा एकूण तीन फेऱ्या रद्द झाल्या. रविवारी पुण्याला जाणाऱ्यांची मध्यवर्ती बसस्थानकात अधिक गर्दी असते. शिवाय पुण्याला जाण्यासाठी शिवनेरी बसच्या प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सायंकाळी प्रवास करण्यावर बहुतांश जणांचा भर असतो; परंतु नेमक्या याच वेळेतील फेऱ्या रद्द होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शिवनेरीच्या ज्या फेऱ्या रद्द होतात, नेमक्या त्याच वेळेत बसच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना पळविणारे दलाल दिसतात. दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आला; परंतु त्याव्यतिरिक्त दलालांना रोखण्यासाठी महामंडळाकडून कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.