शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अभियंत्यांची ओळीनेही चौकशी नाही

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

संतोष धारासूरकर , जालना अवघ्या दोन वर्षांत ३०:५४ या लेखाशीर्षाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याकरिता केलेल्या ७० कोटी ८० लाख रुपयांच्या उधळपट्टीच्या प्रकरणांत उच्चपदस्थ

संतोष धारासूरकर , जालनाअवघ्या दोन वर्षांत ३०:५४ या लेखाशीर्षाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याकरिता केलेल्या ७० कोटी ८० लाख रुपयांच्या उधळपट्टीच्या प्रकरणांत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरु करीत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असा सूर उमटत आहे.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने (क्रमांक एक) २०१३-१४ व २०१४- १५ या दोन आर्थिक वर्षात रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. विशेषत: ३०:५४ या लेखाशीर्षाखाली या विभागाने कोट्यवधीची उधळपट्टी करताना सर्व नियम, संकेत अक्षरश: धाब्यावर बसविले. तत्कालीन वादग्रस्त कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत यांनी आपल्या कारकिर्दीत म्हणजे २५ जून २०१३ ते १८ जुलै २०१४ या दरम्यान ३०:५४ या लेखाशीर्षाखाली रस्ते देखभाल दुरुस्तीकरिता मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगारांना बेमालूमपणे कोट्यवधींची कामे वितरित केली. गंमत म्हणजे त्या पूर्वी प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून २८ आॅगस्ट २०१२ पासून २४ जून २०१३ या दरम्यान म्हणजे दहा महिने काम पाहणाऱ्या तसेच वर्षानुवर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या उपअभियंता एम.आर.सिद्दीकी यांनीही या लेखाशीर्षाखाली बेकायदेशीरपणे कोट्यवधींची कामे खिरापतीसारखी वाटली. या दोघा वादग्रस्त अभियंत्यांनी दोन वर्षांत रस्ते देखभाल दुरुस्ती योजने तर ७० कोटी ८० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे कागदोपत्री दर्शविले आहे. गंमत म्हणजे २०१३- २०१४ व २०१४-२०१५ या लेखा शीर्षाअंतर्गत एकूण १८ कोटी ३५ लाख रुपयांची बिले सुद्धा संबंधितांना अदा करण्यात आली आहे. आता ५२ कोटी ४५ लाख रुपयांची बिले याच लेखाशीर्षाखाली थकित असल्याचे दाखविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण २०१३- २०१४ या आर्थिक वर्षात ५० कोटी ९१ लाख किंमतीच्या बी-१ आणि ५४६ निविदा करण्यात आल्या. तसेच २०१४-२०१५ जुलै अखेर १ कोटी ५४ लाख किंमतीच्या बी-१ ४८ निविदा झालेल्या आहेत. एकूण निविदा ६०४ झाल्या.सद्य स्थितीत २४ कोटींची देयके प्रलंबित आहेत. पूर्वीची प्रलंबित कामे व किंमत काढल्यास खर्चाची रक्कम आणखी वाढेल असे चित्र आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर बांधकाम खात्याने उद्भवलेल्या गोंधळावस्थेत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेता येत नसल्याबद्दल एका पत्राद्वारे अधीक्षक अभियंत्यांकडे खंत व्यक्त केली. सर्व सामान्य जनतेचा रोष वाढतो आहे. असे निदर्शनास आणून प्रलंबित देयकांचे किमान ५० टक्के म्हणजे १२ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केलेली आहे. दरम्यान, एकूण प्रकाराबाबत विभागात चविष्ट चर्चा सुरू आहे.याच पद्धतीने औरंगाबाद सर्कलमधील एका कार्यकारी अभियंत्यांनी मर्यादेपेक्षा अधिक कामे मंजूर केल्याबद्दल सरकारने त्यांच्याविरोधात तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. परंतु जालन्यातील या गैरप्रकाराच्या विरोधात आजवर काडीचीही कारवाई झाली नाही हे विशेष.४३०:५४ (अ गट) या लेखाशीर्षाखाली दरवर्षी पाच ते सहा कोटी रुपयांचीच कामे करावीत असे सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. परंतु या दोघा वादग्रस्त अभियंत्यांनी गेल्या दोन वर्षांत रस्ते देखभाल दुरुस्तीवर पाचपट अधिक कामे मंजूर केली आहेत.