औरंगाबाद : सातारा गावाला वीजपुरवठा करणारी लाईन बंद पडली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली. तब्बल ४० खांबांची तपासणी केल्यावर फॉल्ट सापडला. यात तब्बल चार तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. सातारा परिसरात रोज अघोषित भारनियमन होत आहे. दोन दिवसांपूर्वीच काही भागात कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा झाल्यामुळे वीज उपकरणे नादुरुस्त झाली होती. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जीटीएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोष शोधायला सुरुवात केली. या पथकाने सातारा परिसरातील ४० खांब शोधल्यानंतर एका खांबावरील झांपरिंग खराब झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. सातारा परिसरातील खांबांवर नवीन तारा ओढण्यात आल्या असल्या तरी वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वीजपुरवठा नेमका कुठे खंडित झाला याचा शोध घ्यावा लागतो. लाईन कोणत्या खांबावरून ट्रिप झाली हे सांगणारे यंत्र आमच्याकडे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सातारा परिसरात चार तास वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: July 4, 2014 01:12 IST