शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

औरंगाबाद विकास आराखड्यात खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:07 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर विकासकामे कशी वर्षानुवर्ष खोळंबून राहतात... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथील सुधारित विकास आरखडा २००७ मध्ये मंजुरीसाठी महानगरपालिकेत देण्यात आला. यास यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत; पण अजूनही त्या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. यामुळे मोंढा स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे, हे विशेष.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समिती : दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता असतानाही १० वर्षांपासून प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर विकासकामे कशी वर्षानुवर्ष खोळंबून राहतात... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथील सुधारित विकास आरखडा २००७ मध्ये मंजुरीसाठी महानगरपालिकेत देण्यात आला. यास यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत; पण अजूनही त्या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. यामुळे मोंढा स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे, हे विशेष.‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ जयघोष करीत शिवसेना व भाजप महानगरपालिकेच्या सिंहासनावर विराजमान झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल’ असे नाव धारण केलेल्या कृउबा समितीच्या सुधारित विकास आरखड्यास मंजुरी देण्यासाठी हीच मंडळी ‘टाळमटाळ’ करीत आहे. हेच शहराचे दुर्भाग्य. कृउबा समितीच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी नसल्याने तेथील प्लॉटला बँक कर्ज देत नाही. यामुळे मोंढा स्थलांतरासारखा मोठा विषय खोळंबला आहे. याशिवाय येथील विविध बांधकाम, रस्ते, शॉपिंग कॉम्प्लेक्स, गोदाम, शीतगृह, स्वच्छतागृह, रायपिनिंग चेंबर आदी कामे लालफितीत पडली आहेत. बाजार समितीच्या सुधारित विकास आरखड्याला ३ जुलै २००७ रोजी पणन संचालकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर मान्यतेसाठी ५ जुलै २००७ मध्ये बाजार समितीने सुधारित आरखडा महानगरपालिकेत सादर केला होता. तेव्हापासून बाजार समितीने तत्कालीन प्रत्येक मनपा आयुक्त, महापौर यांच्या सोबत बैठकी घेतल्या; पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. वाहतूकनगर उभारण्यासाठी महानगरपालिकेने बाजार समितीमधील १० एकरजागेवर अधिकार दाखविला; पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यास मंजुरी दिली नाही. कारण, शेतकºयांनी जागा कृउबाला शेतमाल विक्रीसाठी दिली आहे. यामुळे कृउबात वाहतूकनगर उभारता येणार नाही, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. ती १० एकर जागा न मिळाल्याने मनपाच्या अधिकाºयांनीही राजकीय नेत्यांआड विकास आराखडा मंजुरीसाठी वेळोवेळी ‘खोडा’ घातला. यामुळे बाजार समितीचा विकास खुंटला. आराखड्याला मंजुरी मिळाली असती तर होलसेल व्यापाºयांसाठी ४०० प्लॉट देण्यात आले असते. त्याचा बांधकाम परवाना, मालमत्तापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल मनपाला मिळाला असता.मनपाने घातली बेटरमेंट चार्जेसची अटकृउबाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यासाठी महानगरपालिकेने ‘बेटरमेंट चार्जेस’ची अट घातली आहे. मात्र, आराखडा मंजूर करताना बेटरमेंट चार्ज भरण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्षात बांधकाम मंजुरीच्या वेळेस बेटरमेंट चार्जेस भरावे लागते. हा कायदा आहे, असे आम्ही मनपाला कळविले आहे. यासंदर्भात महापौर यांच्याशी बैठक झाली. पुढील निर्णय घेण्यासाठी लवकरच नवीन बैठक होणार आहे. -राधाकिशन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीन्यायालयाच्या आदेशाकडेही मनपाचे दुर्लक्षसुधारित विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी महानगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने १ मार्च २०१६ रोजी आदेश दिला. त्यात म्हटले होते की, बाजार समितीने लेआऊट मंजुरीबाबत शासनाने १० मार्च २००० रोजी जी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सहायक संचालक नगररचना विभाग यांनी निर्णय घ्यावा. मात्र, १ वर्ष ११ महिन्यांचा कालावधी उलटला, महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले.