शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

औरंगाबाद विकास आराखड्यात खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:07 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर विकासकामे कशी वर्षानुवर्ष खोळंबून राहतात... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथील सुधारित विकास आरखडा २००७ मध्ये मंजुरीसाठी महानगरपालिकेत देण्यात आला. यास यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत; पण अजूनही त्या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. यामुळे मोंढा स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे, हे विशेष.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समिती : दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता असतानाही १० वर्षांपासून प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल तर विकासकामे कशी वर्षानुवर्ष खोळंबून राहतात... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती होय. येथील सुधारित विकास आरखडा २००७ मध्ये मंजुरीसाठी महानगरपालिकेत देण्यात आला. यास यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत; पण अजूनही त्या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. यामुळे मोंढा स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे, हे विशेष.‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ जयघोष करीत शिवसेना व भाजप महानगरपालिकेच्या सिंहासनावर विराजमान झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल’ असे नाव धारण केलेल्या कृउबा समितीच्या सुधारित विकास आरखड्यास मंजुरी देण्यासाठी हीच मंडळी ‘टाळमटाळ’ करीत आहे. हेच शहराचे दुर्भाग्य. कृउबा समितीच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी नसल्याने तेथील प्लॉटला बँक कर्ज देत नाही. यामुळे मोंढा स्थलांतरासारखा मोठा विषय खोळंबला आहे. याशिवाय येथील विविध बांधकाम, रस्ते, शॉपिंग कॉम्प्लेक्स, गोदाम, शीतगृह, स्वच्छतागृह, रायपिनिंग चेंबर आदी कामे लालफितीत पडली आहेत. बाजार समितीच्या सुधारित विकास आरखड्याला ३ जुलै २००७ रोजी पणन संचालकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर मान्यतेसाठी ५ जुलै २००७ मध्ये बाजार समितीने सुधारित आरखडा महानगरपालिकेत सादर केला होता. तेव्हापासून बाजार समितीने तत्कालीन प्रत्येक मनपा आयुक्त, महापौर यांच्या सोबत बैठकी घेतल्या; पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. वाहतूकनगर उभारण्यासाठी महानगरपालिकेने बाजार समितीमधील १० एकरजागेवर अधिकार दाखविला; पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यास मंजुरी दिली नाही. कारण, शेतकºयांनी जागा कृउबाला शेतमाल विक्रीसाठी दिली आहे. यामुळे कृउबात वाहतूकनगर उभारता येणार नाही, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. ती १० एकर जागा न मिळाल्याने मनपाच्या अधिकाºयांनीही राजकीय नेत्यांआड विकास आराखडा मंजुरीसाठी वेळोवेळी ‘खोडा’ घातला. यामुळे बाजार समितीचा विकास खुंटला. आराखड्याला मंजुरी मिळाली असती तर होलसेल व्यापाºयांसाठी ४०० प्लॉट देण्यात आले असते. त्याचा बांधकाम परवाना, मालमत्तापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल मनपाला मिळाला असता.मनपाने घातली बेटरमेंट चार्जेसची अटकृउबाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यासाठी महानगरपालिकेने ‘बेटरमेंट चार्जेस’ची अट घातली आहे. मात्र, आराखडा मंजूर करताना बेटरमेंट चार्ज भरण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्षात बांधकाम मंजुरीच्या वेळेस बेटरमेंट चार्जेस भरावे लागते. हा कायदा आहे, असे आम्ही मनपाला कळविले आहे. यासंदर्भात महापौर यांच्याशी बैठक झाली. पुढील निर्णय घेण्यासाठी लवकरच नवीन बैठक होणार आहे. -राधाकिशन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीन्यायालयाच्या आदेशाकडेही मनपाचे दुर्लक्षसुधारित विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी महानगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने १ मार्च २०१६ रोजी आदेश दिला. त्यात म्हटले होते की, बाजार समितीने लेआऊट मंजुरीबाबत शासनाने १० मार्च २००० रोजी जी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सहायक संचालक नगररचना विभाग यांनी निर्णय घ्यावा. मात्र, १ वर्ष ११ महिन्यांचा कालावधी उलटला, महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले.