शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा नसल्याने शाळेसाठी पायपीट

By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे.

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे. कारण या गावाला कोणतीच बस जात नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे.जामठी खु. - हिंगोली हा १५ कि. मी. असणारा रस्ता दळण-वळणाच्या दृष्टीने विकासात मागे राहिला आहे. भांडेगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात खांबाळा, सावा, पारोळा, जामठी, पांगरी, चोरजवळा या गावचे शेकडो विद्यार्थी दररोज सायकलने किंवा पायी ये-जा करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या गावाला जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारची सोय नाही, व्यवस्थित रस्ताही नाही, बस तर नाहीच. स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाले तरीही या भागातील लोकप्रतिनिधींनी बस चालू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. भांडेगाव येथे रस्ता नसल्या कारणाने बस चालू होत नाही, असे सांगण्यात आले; परंतु आता हा रस्ता दुरूस्त करून सुद्धा बस चालू झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये नावाजलेले भांडेगाव लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठे आहे. येथील काही मंडळी राजकारणामध्ये चांगले सक्रीय झाली आहे. बलाढ्य शेतकरी असलेल्या भांडेगाव परिसरातील जामठी, साटंबा, भांडेगाव, नवलगव्हाण, सावा, पारोळा या गावांना बस चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरजच नसल्यासारखे लोकप्रतिनिधींना वाटत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी सायकलने किंवा पायी सात ते आठ कि. मी. अंतर पार करून शाळा गाठावी लागते. शासनाने कित्येक गावांना मानव विकास मिशनच्या बसची सुविधा देण्यात आली. जेणे करून विद्यार्थिनींना शाळेत जाण्याचा त्रास होवू नये; परंतु भांडेगाव येथे शाळेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या १ हजार पेक्षा जास्त आहे. या विद्यार्थिनींना सकाळी सायकल किंवा पायपीट करून शाळा गाठावी लागते; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही. या गावांचा रहदारी या रस्त्यावर अवलंबून आहे. या गावांना जाण्यासाठी बस नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेवून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातात जीवही गमवावा लागला. तरी सुद्धा खाजगी प्रवासाशिवाय पर्याय नसल्याने खाजगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. (वार्ताहर)