शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

बससेवा नसल्याने शाळेसाठी पायपीट

By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे.

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे. कारण या गावाला कोणतीच बस जात नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे.जामठी खु. - हिंगोली हा १५ कि. मी. असणारा रस्ता दळण-वळणाच्या दृष्टीने विकासात मागे राहिला आहे. भांडेगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात खांबाळा, सावा, पारोळा, जामठी, पांगरी, चोरजवळा या गावचे शेकडो विद्यार्थी दररोज सायकलने किंवा पायी ये-जा करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या गावाला जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारची सोय नाही, व्यवस्थित रस्ताही नाही, बस तर नाहीच. स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाले तरीही या भागातील लोकप्रतिनिधींनी बस चालू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. भांडेगाव येथे रस्ता नसल्या कारणाने बस चालू होत नाही, असे सांगण्यात आले; परंतु आता हा रस्ता दुरूस्त करून सुद्धा बस चालू झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये नावाजलेले भांडेगाव लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठे आहे. येथील काही मंडळी राजकारणामध्ये चांगले सक्रीय झाली आहे. बलाढ्य शेतकरी असलेल्या भांडेगाव परिसरातील जामठी, साटंबा, भांडेगाव, नवलगव्हाण, सावा, पारोळा या गावांना बस चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरजच नसल्यासारखे लोकप्रतिनिधींना वाटत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी सायकलने किंवा पायी सात ते आठ कि. मी. अंतर पार करून शाळा गाठावी लागते. शासनाने कित्येक गावांना मानव विकास मिशनच्या बसची सुविधा देण्यात आली. जेणे करून विद्यार्थिनींना शाळेत जाण्याचा त्रास होवू नये; परंतु भांडेगाव येथे शाळेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या १ हजार पेक्षा जास्त आहे. या विद्यार्थिनींना सकाळी सायकल किंवा पायपीट करून शाळा गाठावी लागते; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही. या गावांचा रहदारी या रस्त्यावर अवलंबून आहे. या गावांना जाण्यासाठी बस नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेवून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातात जीवही गमवावा लागला. तरी सुद्धा खाजगी प्रवासाशिवाय पर्याय नसल्याने खाजगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. (वार्ताहर)