शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

गृहेच्छुकांसाठी ‘अच्छे’ दिनचे स्वप्न आता भंगले

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

औरंगाबाद : सिमेंट कंपन्यांची लॉबी सक्रिय झाली असून, उत्पादन कमी करून भाववाढ लादण्यास या लॉबीने सुरुवात केली आहे. मागील २५ दिवसांत ५५ रुपयांनी भाववाढ केली आहे.

औरंगाबाद : सिमेंट कंपन्यांची लॉबी सक्रिय झाली असून, उत्पादन कमी करून भाववाढ लादण्यास या लॉबीने सुरुवात केली आहे. मागील २५ दिवसांत ५५ रुपयांनी भाववाढ केली आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ६० रुपये भाववाढ करण्याचा निर्णय या लॉबीने घेतला आहे. परिणामी, घरांच्या किमती ७ ते ८ टक्क्यांनी महागणार आहेत. बजेट कोलमडणार असल्याने नववर्षात स्वत:च्या घराचे स्वप्न बघणाऱ्यांचे ‘अच्छे’ दिनचे स्वप्न मात्र, भंगणार आहे. जानेवारी ते जून यादरम्यान शासकीय कामे मोठ्या प्रमाणात निघत असतात. यावरच आपला डोळा ठेवून सिमेंट उत्पादकांनी एकत्र येऊन भाववाढ केली आहे. ५ ते ३० डिसेंबरदरम्यान सिमेंटच्या ५० किलो गोणीमागे तब्बल ५५ रुपयांची भाववाढ झाली आहे. २९५ रुपयांची गोणी आता ३५० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. मुळात भाववाढीचे कोणतेही ठोस कारण नसतानाही सिमेंट कंपन्यांनी देशावर भाववाढ लादली आहे.यासंदर्भात औरंगाबाद जिल्हा सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, सिमेंट कंपन्यांनी जाहीर केले आहे की, आणखी १ जानेवारी रोजी ३० रुपये व १५ जानेवारी रोजी ३० रुपये, अशी येत्या पंधरवड्यात ६० रुपये वाढ करून ४१० रुपये प्रतिगोणीपर्यंत भाववाढ नेऊन ठेवणार आहे. दरवर्षी सिमेंट कंपन्या १० रुपये, १५ रुपयांनी हळूहळू सिमेंटचे दर वाढवीत असतात. मात्र, एकदम ५५ रुपयांनी व नंतर १५ दिवसांत दोन टप्प्यांत एकदम ६० रुपयांनी भाववाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिमेंट कंपन्यांनी १० वर्षांपूर्वी एकदाच गोणीमागे ३२ रुपयांनी भाववाढ केली होती. यंदा भाववाढ तर केली आहेच शिवाय कंपन्यांनी ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादनही घटविले आहे. यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याची खेळी कंपन्या खेळत आहेत. केंद्राचे नियंत्रण नसल्याने सिमेंट उद्योग देशवासीयांवर भाववाढ लादत आहे.