शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न राहिले अधुरेच !

By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड बीडचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना विकासाचे व्हिजन तयार केले होते़

व्यंकटेश वैष्णव, बीडबीडचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना विकासाचे व्हिजन तयार केले होते़ जिल्ह्याच्या विकासासंदर्भात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव टी. विजयकुमार यांची बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी बैठक निश्चित केली होती. ही बैठक सात जूनला होणार होती. मात्र मुंडे यांच्या अकाली निधनामुळे सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.२६ मे रोजी गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे ग्रमाविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. पदभार स्विकारल्या नंतर मुंडे हे सतत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी दुरध्वनी वरून संवाद साधायचे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या संदर्भात कोणत्या योजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. आज स्थितीत पाणी पुरवठा संदर्भात काय करायचे याबाबत चर्चा होत होती. जिल्हाधिकारी राम यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना आठ दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यात प्राधान्याने राबवाव्या लागणार्‍या योजनांचा आराखडा दिला होता. मात्र ३ जून रोजी सकाळी मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.निधनाच्या एक - दोन दिवसापुर्वीच मुंडे यांनी जिल्हाधिकारी राम यांच्याशी दुरध्वनीवरून अर्धातास चर्चा केली. यावेळी बीड जिल्ह्यातून होत असलेले मजूरांचे स्थलांतर यासाठी तात्काळ कुठली योजना राबविता येऊ शकते., त्याच बरोबर नरेगा च्या माध्यमातून गावांमध्ये शौचालये उभारणी, पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासंबधी चर्चा झाली. या योजना तात्काळ राबविण्याचे देखील मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बोलून दाखवल्या. मुंडे साहेबांनी सांगितलेल्या योजनांवर जिल्हाधिकारी यांनी काम करण्यास सुरूवात देखील केली होती. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मुंडे यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्यग्रामविकास पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या विविध योजनांवर माझ्याशी चर्चा केलेली आहे. मुंडे यांच्या निधनाच्या एक दिवस अगोदर पर्यंत ते माझ्याशी दुरध्वनीवर बोलले आहेत. त्यांनी बोलून दाखविलेल्या सर्व योजनांना मी प्राधान्य देणार आहे, असे राम यांनी सांगितले.