शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत व्यापार धोरण जाहीर करावे

By admin | Updated: June 26, 2014 00:58 IST

औरंगाबाद : राज्य, केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणारा ७० टक्के महसूल विविध कररूपाने व्यापारीवर्ग जमा करून देतो.

औरंगाबाद : राज्य, केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणारा ७० टक्के महसूल विविध कररूपाने व्यापारीवर्ग जमा करून देतो. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, आजही देशातील व्यापारी उपेक्षितच आहेत. कारण, स्वातंत्र्य मिळविल्यापासून आजपर्यंत देशांतर्गत व्यापार धोरण जाहीर झाले नाही. केंद्र सरकारने येथील व्यापाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी धोरण जाहीर करावे, तसेच देशभरात एकसमान करप्रणालीसाठी ‘जीएसटी’ची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा शहरातील व्यापारीवर्गाने व्यक्त केली. सेमी होलसेलर्स अँड जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी सांगितले की, देशांतर्गत व्यापार धोरण असावे, ही आमची जुनीच मागणी आहे. या केंद्रीय अर्थसंकल्पात व्यापार धोरण जाहीर करण्यात यावे. जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दरख यांनी सांगितले की, संपूर्ण देशात एकसमान करप्रणाली लागू करावी, करप्रणाली सुटसुटीत असावी, यासाठी जीएसटीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, मुकेश गुगळे म्हणाले की, व्यापाऱ्यांना ३६ प्रकारचे परवाने काढावे लागतात. तसेच विविध विभागात कर भरावा लागतो. एक खिडकी योजना लागू करावी व जेथे उत्पादन होते तेथेच एकदाच कर लावण्यात यावा, जेणेकरून करचोरी होणार नाही व सरकारचे उत्पन्न वाढेल. धर्मचंद फुलफगर यांनी सांगितले की, आजपर्यंत जे अर्थसंकल्प जाहीर झाले ते शेतकरी व कॉर्पोरेट क्षेत्र यांना मध्यबिंदू ठेवून करण्यात आले. यंदाचा अर्थसंकल्प व्यापाऱ्यांना केंद्रबिंदू मानून जाहीर करावा. महागाई कमी करण्यासाठी फ्युचर ट्रेडिंग बंद करण्यात यावा, अशी मागणी सुबाहू देवडा यांनी केली तर राजेंद्र शहा म्हणाले की, बँकेचे व्याजाचे दर सुटसुटीत करण्यात यावे. व्यापाऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे, यासाठी योजना जाहीर कराव्यात. सतीशचंद्र सिकची म्हणाले की, सर्वप्रथम देशभरात जीएसटीची अंमलबजावणी करावी. सुमतीशेठ ब्रह्मेचा म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारने सेवाकराची यादी मोठी करून ठेवली आहे. नवीन सेवाकर लावू नये. करप्रणाली सुटसुटीत असावी. कणकमल सुराणा म्हणाले की, शेतकऱ्यांना व उद्योजकांना जशी कर्जात सवलत दिली जाते, तशी सवलत व्यापाऱ्यांना दिली तर व्यापार वाढेल.व्यापाऱ्यांना काय हवेजीएसटी लागू करावाकरप्रणालीत एकसूत्रता आणावीआयकराची मर्यादा वाढवावीशेतीमालावर कर नकोशेतात उत्पादित होणाऱ्या मालावर कोणताही कर आकारण्यात येऊ नये. कारण, कर लावल्याने शेतीमाल महाग होतो. याकरिता देशभरात शेतीमालावर कर आकारण्यात येऊ नये. शेतीमाल घेऊन जाणाऱ्या वाहनाला रोड टॅक्स लावू नये किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी प्रवेश कर लावू नये.व्यापार वाढीस प्रोत्साहन द्यावे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशात मॉल उघडण्यासाठी सवलती दिल्या जातात; पण देशातील व्यापाऱ्यांना कोणतीच सवलत दिली जात नाही. गणेश लड्डा म्हणाले की, व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी बँकेच्या कर्जाची आवश्यकता भासते. जे व्यापारी वेळेवर कर्ज परतफेड करतील, त्यांना व्याजदरात विशेष सवलत दिली, तर देशातील व्यापार वाढेल. नीलेश सोमाणी म्हणाले की, किराणा व धान्य व्यवसायासाठी वेगवेगळे परवाने नकोत. देशातील सट्टेबाजाराला लगाम घालण्यासाठी कडक पावले उचलली तर महागाई कमी होईल.