शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिल्ह्यात ८०० वनराई बंधारे तयार

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी आशा, महिला बचत गट रोजगार सेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या श्रमदानातून तयार केली आहे. या बंधाऱ्यामुळे निसर्गाचा समतोल राहण्यास व पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केले. काम गुणवत्तापूर्ण होऊन प्रभावी पाणीसाठे निर्माण होण्यासाठी तथा साखळी पद्धतीने वनराई बंधारे घेऊन नाल्यावर ठिकठिकाणी पाणीसाठे निर्माण करून जलसंवर्धन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पंचायत समिती स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून शनिवारी पंचायत समिती जालना येथे कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांकडून या मोहिमेसाठी मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत व त्यांच्या सहभागाबाबत अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थामधील ही उर्जा वनराई बंधारे आणि वृक्ष लागवडीसारखी मोहीम यशस्वी ठरत आहे. यातून निसर्गाचा समतोल साध्य करून पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल.या प्रशिक्षणात कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी वनराई बंधारे घेण्यासाठी जागा निवडीपासून ते बंधारा अस्थापित करण्यापर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रत्येक गावात पाच बंधारे तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण तयार करणे. त्यामुळे चांगला पाणीसाठा निर्माण होऊन जलसंवर्धनास मदत होईल, असे सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांनी निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)