शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८०० वनराई बंधारे तयार

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी आशा, महिला बचत गट रोजगार सेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या श्रमदानातून तयार केली आहे. या बंधाऱ्यामुळे निसर्गाचा समतोल राहण्यास व पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केले. काम गुणवत्तापूर्ण होऊन प्रभावी पाणीसाठे निर्माण होण्यासाठी तथा साखळी पद्धतीने वनराई बंधारे घेऊन नाल्यावर ठिकठिकाणी पाणीसाठे निर्माण करून जलसंवर्धन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पंचायत समिती स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून शनिवारी पंचायत समिती जालना येथे कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांकडून या मोहिमेसाठी मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत व त्यांच्या सहभागाबाबत अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थामधील ही उर्जा वनराई बंधारे आणि वृक्ष लागवडीसारखी मोहीम यशस्वी ठरत आहे. यातून निसर्गाचा समतोल साध्य करून पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल.या प्रशिक्षणात कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी वनराई बंधारे घेण्यासाठी जागा निवडीपासून ते बंधारा अस्थापित करण्यापर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रत्येक गावात पाच बंधारे तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण तयार करणे. त्यामुळे चांगला पाणीसाठा निर्माण होऊन जलसंवर्धनास मदत होईल, असे सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांनी निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)