शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

तूर खरेदीत सचिवांचाच खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:20 IST

जिल्ह्यात पुन्हा तूर खरेदी करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत होती. मात्र ती संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असले तरीही बाजार समिती मात्र अजून जागची हलायला तयार नाही. महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांची तूर तर जात नाही याची चाचपणी करण्यास प्रत्यक्ष शेतकºयांच्या घरी पाहणी करून दिलेल्या याद्यांवर काहीच केले नाही. उलट नव्या ७५ शेतकºयांची यादी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पुन्हा तूर खरेदी करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत होती. मात्र ती संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असले तरीही बाजार समिती मात्र अजून जागची हलायला तयार नाही. महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांची तूर तर जात नाही याची चाचपणी करण्यास प्रत्यक्ष शेतकºयांच्या घरी पाहणी करून दिलेल्या याद्यांवर काहीच केले नाही. उलट नव्या ७५ शेतकºयांची यादी दिली.हिंगोली बाजार समितीत सुरवातीपासूनच तूर खरेदीचा गोंधळ उडाला होता. शेतकºयांना डावलून व्यापाºयांचाच माल नाफेडच्या केंद्रावर खरेदी केला जात असल्याच्या उघड तक्रारीही झाल्या. मात्र आम्ही फक्त सुविधा पुरविणारे असल्याचे सांगून बाजार समिती हात झटकत राहिली. तर नाफेडच्या अधिकाºयांनी नियमांचा बाऊ करीत हात धुवून घेतले. यात शेतकºयांची तूर तशीच पडून राहिली. नंतर सरकारने मुदतवाढीचे फंडे आणले अन् नाफेडने खरेदी केेंद्र बंद ठेवले. पुन्हा बारदान्याचा प्रश्न समोर आला. शेवटच्या टप्प्यात नोंदणी केलेल्या नव्हे, टोकन दिलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी करण्याचा आदेश आला. यात चार हजार शेतकºयांची ५४ हजार क्विंटल तूर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तिला मंजुरी मिळेपर्यंत खुल्या बाजारातच तुरीचे दर पाच हजारांवर गेले. अनेकांनी यातच तूर विकली. नंतर केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीने टाळाटाळ चालविली असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. जिल्हाधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी तूरसाठा तपासणीचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार हिंगोली उपविभागात हिंगोलीत ११३ शेतकºयांकडे १५८१ क्विंटल तर सेनगाव तालुक्यातील ७६ शेतकºयांकडे ७0७ क्विंटल तुरीचा साठा असल्याचे प्रत्यक्ष तपासणीत आढळले होते. सुटीच्या दिवसांतही हे काम केला. तर कळमनुरी उपविभागातील १0 शेतकºयांकडे तूर आहे.अशा २२२ शेतकºयांची यादीही प्रशासनाने २८ आॅगस्टला बाजार समितीस नेण्यास कळविले. मात्र ती न नेता आणखी ७५ शेतकºयांची यादी त्यांनी प्रशासनाकडे पाठविली. त्यामुळे त्यांची तपासणी कधी करायची? हा प्रश्न आहे. ती न झाल्यास या शेतकºयांकडे तूर असल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्याला पूर्णपणे जब्बार पटेल हेच जबाबदार राहतील, असे पत्रात म्हटले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.