शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

रिक्षा बंदमुळे गैरसोय

By admin | Updated: December 23, 2014 00:58 IST

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारी काही रिक्षा संघटनांनी बंद पाळला.

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारी काही रिक्षा संघटनांनी बंद पाळला. यामध्ये जालना रोड, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, रेल्वेस्थानकासह विविध मार्गांवर अवघ्या १० ते १५ रुपयांत वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद होत्या. यामुळे प्रवाशांची पायपीट झाली. शिवाय मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ आणि शहर बसला गर्दी दिसून आली.रिक्षाचालकांच्या बंदमुळे २४ तास वर्दळीचा जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानकांसह विविध भागांत सकाळपासूनच रिक्षांची तुरळक गर्दी दिसून आली. दररोज प्रवासी दिसताक्षणी रिक्षा थांबविल्या जात असल्याचे चित्र दिसून येते. शहर बसथांब्यांवर रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांचीच गर्दी असते; परंतु बंदमुळे प्रवासी रस्त्यांवर उभे राहून रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांची वाट बघत होते. ये-जा करणाऱ्या रिक्षांना प्रवासी हात दाखवून थांबविताना दिसून आले. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तरीही प्रवाशांना रिक्षांची शोधाशोध करावी लागली. शहरात आलेल्या पाहुण्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.रिक्षा बंद ठेवण्यासाठी वादबंदची हाक दिल्यानंतरही सोमवारी अनेक मार्गांवर रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू होती; परंतु अन्य रिक्षाचालकांनी अशा रिक्षा अडवून रिक्षा बंद करण्यास भाग पाडले, तर प्रवाशांनाही रिक्षातून खाली उतरविण्यासाठी वाद घातला. भडकलगेट, रेल्वेस्थानक, सिडको बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय इ. ठिकाणी असे प्रकार घडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका रिक्षाची काच फोडण्याचा प्रकारही झाला.जादा कमाईबंदचा फायदा घेत काही रिक्षाचालकांनी चांगलीच कमाई करून घेतली. अनेक मार्गांवर प्रवाशांकडून जादा भाड्याची वसुली करण्यात आली. अनेकांनी एका प्रवाशाकडून ४० ते ५० रुपये वसूल केले.४विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाही बंद राहिल्याने शाळेत ये-जा करण्यासाठी पायपीट करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. शाळा परिसरात विद्यार्थ्यांचे पालक दुचाकी व अन्य वाहनांनी येताना-जाताना दिसून आले. अनेक पालकांनी शहर बसमधून विद्यार्थ्यांना सोडले.शहरात जवळपास परवानाधारक २० हजार रिक्षा असून, बंददरम्यान १५ हजार रिक्षा बंद होत्या. बंदला जवळपास ८० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.४रिक्षा बंदमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी. महामंडळाने जादा बसेस सोडल्या. रोज ३० ते ३५ धावणाऱ्या बसची संख्या ४८ करण्यात आली. अपुऱ्या शहर बसच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील बसेस वापरण्यात आल्या. जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको, औरंगपुरा आदी मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. तरीही ठिकठिकाणी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. ४दररोज रिकाम्या धावणाऱ्या शहर बसेस सोमवारी भरून जाताना दिसल्या. दररोज शहर बसचे उत्पन्न जवळपास दीड लाख रुपये होते; परंतु बंदमुळे दुपारपर्यंतच १ लाख ३८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. सायंकाळपर्यंत हे उत्पन्न दुप्पट झाले.