शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

संचालकांची उदासीनता

By admin | Updated: April 24, 2016 00:11 IST

विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अध्यासने उदंड जहाली’, असे म्हणायची वेळ आली आहे.

विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अध्यासने उदंड जहाली’, असे म्हणायची वेळ आली आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या रेट्यामुळे विद्यापीठात अनेक महापुरुष व राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासने सुरू झाली काही तत्त्वत: मान्य झाली, तर काही प्रस्तावित आहेत. या अध्यासनांसाठी विद्यापीठाने अलीकडच्या काळात सात ते आठ पटीने अनुदानाची तरतूदही केली; पण संचालकांनी स्वत:चे मानधन उचलण्यापलीकडे अध्यासनांच्या माध्यमातून भरीव असे उपक्रम राबविल्याचे दिसत नाही. प्रामुख्याने जगभरात संबंधित महापुरुषांच्या नावे किंवा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाला चालना देणे, प्रासंगिक कार्यक्रम आयोजित करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करणे, पदवी-पदविका अभ्यासक्रम राबविणे, पुणे-मुंबई विद्यापीठातील अध्यासनांच्या धर्तीवर काही साहित्य प्रकाशित करणे आदी उपक्रम राबविणे, या उद्देशाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली. मात्र, बहुतांशी अध्यासने केवळ महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यापुरतीच मर्यादित झाली आहेत. अर्थात, काही अध्यासने याला अपवाद आहेत. उल्लेखनीय काम करणाऱ्या मौलाना आझाद, गौतम बुद्ध आणि ताराबाई शिंदे या तीन अध्यासनांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदानदेखील मिळते. विशेष म्हणजे, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राला बाराव्या पंचवार्षिक योजनेतून पदांनाही मंजुरी मिळाली आहे. या अध्यासन केंद्रामार्फत ‘वूमेन्स स्टडी’ हा पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविला जातो. याचप्रमाणे मौलाना आझाद अध्यासन केंद्रामार्फत ‘आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्द’ हा पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. अन्य अध्यासन केंद्रांमध्ये मात्र पदवी-पदविका अभ्यासक्रम, संशोधनाबाबत उदासीनताच दिसून येते. अध्यासन केंद्रामार्फत संशोधन छात्रवृत्ती देण्यासाठी तरतूद आहे; पण ६ ते ७ अध्यासन केंद्रांनी एकाही संशोधक विद्यार्थ्याला ही छात्रवृत्ती दिलेली नाही.सन २०१४-१५ पर्यंत अध्यासनांसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रतिवर्ष दीड लाख रुपये एवढी तरतूद केली जात होती. मागील सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून मात्र, तब्बल सव्वाआठ लाख रुपये एवढी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यंदाही तेवढीच तरतूद आहे. यामध्ये संबंधित संचालकांचे मानधन (हजार ते दोन हजार रुपये प्रतिमहिना), मुद्रण आणि लेखन सामुग्री, आकस्मिक खर्च, चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा, शिबिरे व स्पर्धांचे आयोजन, संशोधन प्रकल्प, हस्तलिखिते, दस्तावेज आणि संशोधन यासाठी तरतूद करण्यात येते. तरतूद आहे; पण खर्च नाही, अशी अवस्था विद्यापीठातील अध्यासन केंद्रांची झाली आहे.