शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

डेंग्यूचे ३ बळी तर साथीचे शेकडो रूग्ण

By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST

भास्कर लांडे, हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले.

भास्कर लांडे, हिंगोलीजिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले. अद्यापही साथ आटोक्यात आली नसताना जिल्हा आरोग्य विभागाकडे साथीच्या रूग्णांच्या दैनंदिन नोंदीही होत नाहीत. आजपर्यंत ग्रामीण भागात कहर करणारे हे आजार आता शहरात पाय पसरत आहेत. त्यातच शनिवारी डेंग्यूसदृश्य आजाराने आणखी एक दगावल्याने भीती वाढली आहे. स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.पिंपळदरीत डेंग्यूचा पहिला रूग्ण आढळल्याला आज महिना उलटला. तरीही साथ अटोक्यात येत नाही. उलट वेगवेगळ्या गावांतील रूग्ण समोर येताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी वटकळी येथील संगीता रमेश शिंदे (वय २६) आणि माझोड येथील गंगाधर वामन मुळे (२२) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. दरम्यान, इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले. कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे सहा जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. महिनाभरात ५५ रूग्णांनी सामान्य रूग्णालयात उपचार घेतले. वटकळी आणि इंचा येथे अनुक्रमे १६ रूग्ण तापाने होरपळले. एकूण १२४ रूग्णांनी हिंगोलीत उपचार घेतले. आजारांनी थैमान घातले असता शासकीय यंत्रणा सुस्त आहे. गावात नियमित साफसफाई होत नाही, नाल्या उपसल्या जात नाहीत, रस्त्यावर सांडपाणी येते हेच चित्र शहरी भागातही दिसते. पं.स. व नगरपालिकांना काही देणेघेणे नाही. आजार आला की आरोग्य विभागाकडे बोट दाखवतात. दुसरीकडे आरोग्य विभाग ग्रामपंचायत स्वच्छता ठेवत नसल्याने हे आजार उद्भवल्याचे सांगून हात वर करते. जनजागृतीच्या नावाने पत्ता नसताना साथ आलीच तर त्या गावात सर्वेक्षण केले जाते. दररोज वेगवेगळ्या गावचे रूग्ण समोर येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील सवड येथील एकाच तापाने मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन्हीही सुस्त यंत्रणांचा अनेकांना फटका बसत आहे.