शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

डेंग्यूचे ३ बळी तर साथीचे शेकडो रूग्ण

By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST

भास्कर लांडे, हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले.

भास्कर लांडे, हिंगोलीजिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले. अद्यापही साथ आटोक्यात आली नसताना जिल्हा आरोग्य विभागाकडे साथीच्या रूग्णांच्या दैनंदिन नोंदीही होत नाहीत. आजपर्यंत ग्रामीण भागात कहर करणारे हे आजार आता शहरात पाय पसरत आहेत. त्यातच शनिवारी डेंग्यूसदृश्य आजाराने आणखी एक दगावल्याने भीती वाढली आहे. स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.पिंपळदरीत डेंग्यूचा पहिला रूग्ण आढळल्याला आज महिना उलटला. तरीही साथ अटोक्यात येत नाही. उलट वेगवेगळ्या गावांतील रूग्ण समोर येताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी वटकळी येथील संगीता रमेश शिंदे (वय २६) आणि माझोड येथील गंगाधर वामन मुळे (२२) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. दरम्यान, इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले. कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे सहा जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. महिनाभरात ५५ रूग्णांनी सामान्य रूग्णालयात उपचार घेतले. वटकळी आणि इंचा येथे अनुक्रमे १६ रूग्ण तापाने होरपळले. एकूण १२४ रूग्णांनी हिंगोलीत उपचार घेतले. आजारांनी थैमान घातले असता शासकीय यंत्रणा सुस्त आहे. गावात नियमित साफसफाई होत नाही, नाल्या उपसल्या जात नाहीत, रस्त्यावर सांडपाणी येते हेच चित्र शहरी भागातही दिसते. पं.स. व नगरपालिकांना काही देणेघेणे नाही. आजार आला की आरोग्य विभागाकडे बोट दाखवतात. दुसरीकडे आरोग्य विभाग ग्रामपंचायत स्वच्छता ठेवत नसल्याने हे आजार उद्भवल्याचे सांगून हात वर करते. जनजागृतीच्या नावाने पत्ता नसताना साथ आलीच तर त्या गावात सर्वेक्षण केले जाते. दररोज वेगवेगळ्या गावचे रूग्ण समोर येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील सवड येथील एकाच तापाने मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन्हीही सुस्त यंत्रणांचा अनेकांना फटका बसत आहे.