शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

१५ कोटींची मागणी

By admin | Updated: June 10, 2016 23:45 IST

परभणी : जिल्ह्यातील टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाने या निधीची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे.

परभणी : जिल्ह्यातील टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाने या निधीची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे. मात्र अद्याप हा निधी प्राप्त झाला नसल्याने टंचाई निवारणाची कामे संथगतीने सुरु आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र झाली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच टंचाईचे नियोजन प्रशासनाला करावे लागले होते. सप्टेंबर ते जून या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला होता. सुमारे ४४ कोटी ८९ लाख ४७ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार कामांनाही प्रारंभ झाला. अनेक कामे सुरु झाली असली तरी निधीची कमतरता प्रशासनाला भासत आहे. जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ विविध कामे सुरु आहेत. त्यात विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजना यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करुन परिसरातील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविणे अशी कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाचशेहून अधिक विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उपलब्ध निधीतून टँकर आणि अधिग्रहणाची कामे होत असली तरी इतर कामांसाठी अद्याप प्रशासनाला निधी उपलब्ध झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने मे अखेर १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे नोंदविली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यातून नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना यासह इतर कामांसाठी निधी वापरता येणार आहे. जिल्ह्यातील नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ६ कोटी २४ लाख ८२ हजार रुपये, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेसाठी ८९ लाख २० हजार रुपये, नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी ६१ लाख ९ हजार रुपये, विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ३६ लाख ७९ हजार रुपये, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४ कोटी २९ लाख ४० हजार रुपये आणि खाजगी विहीर अधिग्रहणासाठी २ कोटी ९२ लाख १ हजार रुपये अशा १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीची प्रशासनाला आवश्यकता आहे. मे अखेर या निधीची मागणी नोंदविली असली तरी अद्याप जिल्ह्याला निधी प्राप्त झालेला नाही. सध्या प्रशासनाने ही कामे प्रस्तावित केली आहेत. कामांची प्रक्रिया सुरु झाली असून निधी उपलब्ध झाल्यास या कामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)