शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

आघाडी सरकारकडून घोषणाच !

By admin | Updated: August 10, 2014 02:21 IST

लातूर : राज्यातील आघाडी सरकारने केवळ घोषणाच केल्या, कृती मात्र काहीच केली नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी

लातूर : राज्यातील आघाडी सरकारने केवळ घोषणाच केल्या, कृती मात्र काहीच केली नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले़लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते़ यावेळी प्रदेश सरचिटणीस संभाजीराव पाटील निलंगेकर, उपाध्यक्ष गोविंद केंदे्र, प्रवक्ते गणेश हाके, मेळावा संयोजक रमेश कराड, डॉ़ गोपाळराव पाटील, टी़पीक़ांबळे, दिलीपराव देशमुख, अ‍ॅड़ बळवंतराव जाधव, ओम गोडभरले, नवनाथ भोसले, शैैलेष लाहोटी, मोहन माने, डॉ़ गितांजली पाटील, शालिनी कराड, मंजुषा कुटवाड, ललिता कांबळे, हनुमंतबापू नागटिळक, श्रीकृष्ण जाधव यांची उपस्थिती होती़३० वर्षानंतर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत मिळाल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे पानीपत झाले़ राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे़ सध्या मराठवाडा कोरडा असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जागा वाटपात मशगूल आहेत़ शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली़ महायुतीची सत्ता आल्यास महराष्ट्र भारनियमनमुक्त करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ राज्यात महायुतीचे सरकार नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची अंमलबजावणी होणार नाही़ विद्यमान मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घेत नाहीत़ रेणापूर भागाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व़ गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट मतदारांनी जप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी माजी उपसभापती विक्रम शिंदे, अमोल पाटील, हणमंत कापरे, रघुनाथ पाटील, विष्णु पोहरेगावकर, किशन लोमटे, दिंगबर गिरी, गनिमीकावा संघटनेचे बालाजी सूर्यवंशी, रवि सूर्यवंशी, देवा चिंचोलकर, महिला काँगे्रसच्या उपाध्यक्ष ज्योती भोकरे, सेनेचे सचिन मोटेगावकर, मारूती गणेशकर, रमाकांत संपत्ते, लोकसंग्रामचे बाळासाहेब होळकर, संतराम जटाळ, माजी सभापती अनिल शिंदे, भागवत संपत्ते, प्रवीण येळ्ळे, भारीपचे भगवान कोकाटे, बाळासाहेब शिंदे, बाजार समितीचे माजी संचालक नागेश वाघमारे, विलास पाटील, वसंतराव काळे, शिवाजीराव मोरे, अशोक खुने, गणेश बोंबडे, कार्तिक स्वामी, रावसाहेब बरडे आदींनी भाजपात प्रवेश केला़ (प्रतिनिधी)