शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

नवमतदार ठरणार निर्णायक घटक

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने या निवडणुकीत नवमतदारांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत नवमतदारांचा मोठा बोलबाला सुरु आहे. विशेषत: हा मतदार कमालीचा जागरुक झाला असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांनी या नव्या मतदारांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच त्या-त्या मतदारसंघात नवमतदारांना आकर्षिक करण्याकरिता मातब्बर पुढारी ऐनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. विशेषत: नवमतदारांना त्या-त्या कार्यक्षेत्रात दरवर्षी करिअर गाईडन्स, नोकरी महोत्सव, स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य वगैरेचे आमिष दाखविले जात आहे. या विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत एकूण १४ लाख ९५ हजार ३६९ मतदार होते. निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत १ लाख ६ हजार १०३ नवमतदारांनी नोंदणी केली. तसेच मार्च महिन्यात एक दिवसीय नोंदणी अभियान राबविण्यात आले. यातही २९ हजार ५६५ मतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील मतदारांच्या संख्येत १ लाख ३५ हजार ६६८ ने वाढ झाली. यात ७३ हजार १९२ पुरूष तर ६२ हजार ४७६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक मतदार वाढले. व या नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. या विधानसभेतही नवमतदार उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेईल, असा अंंदाज आहे. यंदाच्या निवडणुकीला युवा वर्गामध्ये मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी युवकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्स-अप या सोशल नेटवर्किंग माध्यमांसह टीव्ही वरील जाहिरातींमुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसत आहे. जालना शहरातील विविध सामाजिक संघटनाही मतदानाच्या जागृतीविषयी सरसावल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वतीनेही शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, मोबाईल व्हॅन, संकल्प पत्र भरून घेणे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)