शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

नवमतदार ठरणार निर्णायक घटक

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने

जालना : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली असून त्यात बहुतांश युवा मतदार असल्याने या निवडणुकीत नवमतदारांचा टक्का निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत नवमतदारांचा मोठा बोलबाला सुरु आहे. विशेषत: हा मतदार कमालीचा जागरुक झाला असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांनी या नव्या मतदारांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच त्या-त्या मतदारसंघात नवमतदारांना आकर्षिक करण्याकरिता मातब्बर पुढारी ऐनकेन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. विशेषत: नवमतदारांना त्या-त्या कार्यक्षेत्रात दरवर्षी करिअर गाईडन्स, नोकरी महोत्सव, स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य वगैरेचे आमिष दाखविले जात आहे. या विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत एकूण १४ लाख ९५ हजार ३६९ मतदार होते. निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत १ लाख ६ हजार १०३ नवमतदारांनी नोंदणी केली. तसेच मार्च महिन्यात एक दिवसीय नोंदणी अभियान राबविण्यात आले. यातही २९ हजार ५६५ मतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील मतदारांच्या संख्येत १ लाख ३५ हजार ६६८ ने वाढ झाली. यात ७३ हजार १९२ पुरूष तर ६२ हजार ४७६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ लाख १३ हजाराहून अधिक मतदार वाढले. व या नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. या विधानसभेतही नवमतदार उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेईल, असा अंंदाज आहे. यंदाच्या निवडणुकीला युवा वर्गामध्ये मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. यावर्षी युवकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्स-अप या सोशल नेटवर्किंग माध्यमांसह टीव्ही वरील जाहिरातींमुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसत आहे. जालना शहरातील विविध सामाजिक संघटनाही मतदानाच्या जागृतीविषयी सरसावल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वतीनेही शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, मोबाईल व्हॅन, संकल्प पत्र भरून घेणे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)