शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गांधी चौकात विसावते ड्रायव्हरांची पहाट

By admin | Updated: July 19, 2014 00:41 IST

सितम सोनवणे, लातूर पहाटेच्या वेळी लातुरात ट्रॅव्हल्स येण्याची गर्दी असते़ बहुतांश ट्रॅव्हल्स गांधी चौकात शेवटचा टप्पा पूर्ण करतात़ लोकांचा दिवस सुरु होत

सितम सोनवणे, लातूरपहाटेच्या वेळी लातुरात ट्रॅव्हल्स येण्याची गर्दी असते़ बहुतांश ट्रॅव्हल्स गांधी चौकात शेवटचा टप्पा पूर्ण करतात़ लोकांचा दिवस सुरु होत असतानाच ट्रॅव्हल्सचालकांची पहाट मात्र गांधी चौकात विसावते़ प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत रात्रभराचा प्रवास पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते़ गांधी चौकात शुक्रवारी पहाटे ४ वाजता वातावरण एकदम शांत होते़ बाहेरगावाहून आलेली बस गांधी चौक मार्गे बसस्थानकाकडे भुर्रकन निघून जातात़ एखादा आॅटो बसस्थानकाकडून गांधी चौकात येऊन पुढे शिवाजी चौकाकडे जातो़ झाडावर शांत झोपलेले पक्षी गाडीच्या आवाजाने किलबिलाट करतात़ तुरळक माणसांची वर्दळही सुरु असते़ गांधी चौकातील शांतता, आॅटो - बस यांच्या आवाजाने भंग होत होती़ त्यामध्ये अचानकच पाण्याच्या टाकीजवळ एक मोकाट कुत्र्यांचा घोळका मोठमोठ्याने भुंकत एकमेकांच्या अंगावर जात होता़ औरंगाबाद येथून आलेली ट्रॅव्हल्स गांधी चौकात थांबली़ ती थांबताच शेवटच्या टप्प्यातील सर्व प्रवाशी उतरले़ प्रवाशी खाली उतरताना पाहून ४-५ आॅटोंचा गराडा ट्रॅव्हल्सच्या अवतीभोवती फिरू लागला़ प्रवाशी व आॅटोचालकांत चर्चा होते, भाडे ठरते़ प्रवासी आॅटोत बसून, कुटुंबियांसह घराकडे निघून जातात़ पहाटे ४ पासूनच प्रवाशांच्या प्रतिक्षेत असणारे आॅटोचालक प्रवाशी मिळाले की, पहिला ग्राहक म्हणून जास्त आढेवेढे न घेता पटकन प्रवाशांना घेऊन निघून जातात़ भाजी मार्केटसाठी निघालेले हातगाडे गांधी चौकातूनच पुढे जुन्या बसस्थानकाच्या रस्त्याने निघून जात होते़ मॉर्निंग वॉकसाठी महिला, पुरुष, काहीजण परिवारासह फिरताना दिसून आले़ जाताजाता महालक्ष्मी मंदिरासमोर नतमस्तक होऊन पुढे जात़ बसस्थानकाकडून आलेली पोलिस जीप गांधी चौकाला फेरी मारून पोलिस ठाण्याकडे गेली़पहाटे ५ नंतर ट्रॅव्हल्स येण्याची संख्या वाढत गेली़ या ट्रॅव्हल्स औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, लातुरलाच थांबणाऱ्या तर काही पुढे अहमदपूर, उदगीर, नादेंडला जाणाऱ्या पुढे निघून जात़ ज्या ट्रॅव्हल्स लातूरच्या आहेत, त्यातील सर्व प्रवाशी उतरले की, ट्रॅव्हल्स आपल्या त्यांच्या-त्यांच्या आॅफिससमोर थांबतात़ ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर हा प्रवास चांगला झाल्याचे समाधान व्यक्त करत तोही त्यांच्या कार्यालयात विसावतो़ दिवसभर चांगली झोप झाली तर रात्रीचा प्रवास सुखकर होतो़ त्याची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे़ नाशिकहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा १२ तासाचा प्रवास होतो़ यात २ ड्रायव्हर असतात़ अदलून बदलून गाडी चालवत प्रवाशांची सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी असल्याने ही व्यवस्था करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ प्रवासात निष्काळजीपणा दुर्लक्ष करून चालत नाही़ त्यासाठी काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करणे आमची जबाबदारी असते, असे ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरांनी सांगितले़प्रवाशांची सुरक्षा ही पुर्णत: चालकांवर अवलंबून असते़ त्यामुळे त्यांची झोप पूर्णपणे होणे व तो निर्व्यसनी असणे गरजेचे आहे, असे मत लातुरात उतरलेले प्रवासी प्रा़ भोसले यांनी यावेळी व्यक्त केले़ ट्रॅव्हल्सचालक सतीश चव्हाण म्हणाले, औरंगाबाद येथून रात्री १२ वाजता निघालो होतो़ पहाटे ५ वाजता आलो आहे़ आता दिवसभर आराम करून रात्री १२ वाजता परतीचा प्रवास करायचा आहे़