लातूर : शहरातील प्रभाग क्र ३० व ३३ या भागात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे साथीच्या आजाराची लागण होत आहे़ या भागात आरोग्य विभागाने पाठ फिरविल्याने आठवडाभरापासून तापीच्या आजाराचे रूग्ण वाढले आहेत़ या प्रभागातील डेंग्यूसदृश्य आजाराने त्रस्त असलेल्या ६ जणांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे़ परिणामी, लहान मुलांमध्ये उष्णतेमुळे चिडचिडेपणा येत आहे़ ताप, खोकला आदी प्रकारचे आजार ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढत आहेत़ प्रभाग क्ऱ ३० व ३३ मधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़ परिणामी, ताप, खोकला आदी प्रकारच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ अंजली नगर, साठे नगर, मणियार नगर आदी ठिकाणच्या बहुतांश भागात कचर्याचे ढिग पडले आहेत़ गटारी तुंबल्याने दुर्गंधी वाढली आहे़ या भागातील अमित कैलास क्षीरसागर, अरोरी बंकट चामले, तक्षशिला सत्यवान जोगदंड, प्रतिक धनराज सिरसाट, श्रध्दा हणमंत कांबळे, अश्विनी शिवाजी सोनवणे या बालकांवर सध्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे नगरसेवक राजेंद्र इंद्राळे यांनी सांगितले़ प्रभागातील आरोग्यसेवेकडे होत असलेल्या दुर्लक्षाची तक्रार इंद्राळे यांनी मनपा आयुक्तांकडे सोमवारी केली़ डेंग्यू सदृश्य आजाराच्या बालकांची यादीच त्यांनी आयुक्तांकडे सुपुर्द केली आहे़ (प्रतिनिधी) आरोग्य विभागाचे दुर्लक्ष़़़ प्रभागात गटारी तुंबलेल्या आहेत़ त्या त्या वेळी कचरा उचलण्यात येत नाही़ गटारीतील पाणी एकाच ठिकाणी साचत असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहेत़ डासांनी चावा घेतल्यामुळे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण होत आहे़ सहा बालकांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचार्यांनी या प्रभागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे़ स्वत: तक्रार केल्यावरही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र इंद्राळे यांनी सांगितले़
डेंग्यूसदृश्य आजारांनी बालके त्रस्त
By admin | Updated: May 27, 2014 00:57 IST