शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

शासकीय कार्यालयातून अधिकाऱ्यांची ‘दांडी’यात्रा

By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST

गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत.

गेवराई : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली जात आहेत. कार्यालयात वेळेवर हजर रहावे, अशा सूचना असून सुद्धा ते येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.येथील पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तहसील, पाणीपुरवठा विभाग, जि.प. उपबांधकाम विभागसह अनेक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी कार्यालयाच्या म्हणजे सकाळी १० वा. येण्याची वेळ तर कार्यालय ५ वा. बंद होण्याची वेळ असताना देखील हे सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारी १२ वा. येतात तर काही अधिकारी कार्यालयात दिसतच नाहीत. या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी नसल्याने कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात. या नागरिकांना ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन पैसे खर्चून यावे लागते. मात्र अधिकारी नसल्याने नाहक खर्च सहन करावा लागत आहे. काही अधिकारी कार्यालयात असेच तर लगेच गायब होताना दिसतात. त्यामुळे नागरिकांची कामे होताना वेळ लागत आहे. या आधीही या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. या सर्व दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, सचिन दाभाडे, पप्पू गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)