शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जिल्हा बँकेकडून कोंडी

By admin | Updated: December 22, 2014 23:56 IST

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची करोडो रुपयांची जमापुंजी अडकली आहे.

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची करोडो रुपयांची जमापुंजी अडकली आहे. बँकेत स्लिप दिली तर चलनटंचाईचे कारण पुढे करून रकमा दिल्या जात नाहीत. अशा स्थितीत सध्या बँकेत पीक विमा भरून घेतला जात आहे. यात कहर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आपल्या खात्यावर शिल्लक जमा आहे, त्यांना ती रक्कम विम्यासाठी वळती करून घेण्यासही नकार देत शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. कळंब तालुक्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँकेच्या कळंब, मार्केट यार्ड, ईटकूर, मोहा, येरमाळा, मस्सा, वाघोली, शिराढोण, दहिफळ, कळंब शहर, खामसवाडी, पाडोळी या ठिकाणी १२ शाखा आहेत. एकेकाळी ही बँक शेतकऱ्यांचा मुख्य आधार होती. ग्रामीण भागातील सर्वस्वी व्यवहार या शाखेवर अवलंबून होते. पीक कर्जापासून ते शेती विकासापर्यंत या बँकेतून कर्ज दिले जात असे. शिवाय शेतकरी, शेतमजूर आपली शिल्लक जमापुंजी या बँकेत मोठ्या विश्वासाने ठेवत होते. परंतु सध्या बँक अडचणीत आल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. हक्काची रक्कम बँकेच्या पायऱ्या झिजवूनही पदरी पडत नाही. बँकेच्या तालुक्यातील शाखांतील रोखपालाचे टेबल गेल्या चार-पाच महिन्यापासून ठप्प आहे. बँकेत अनेकांच्या मुदत ठेवींचा कालावधी संपला आहे. त्यांनाही आपापल्या रकमा मिळत नाहीत. बचत खात्यावरील रक्कम मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या शाखेत स्लिप भरून देतात. मात्र त्यांना चकरा मारायला भाग पाडून अखेर पैसे नाहीत, असे सांगितले जाते. सध्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसाठी जिल्हा बँकेतील शाखेत विमा प्रस्ताव भरून घेतले जात आहेत. यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. यावर्षी खरीप हंगामात उत्पादन आणि उत्पन्नाने साथ न दिल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे. रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना विमा भरण्याची इच्छा असताना केवळ हातात छदामही नसल्याने अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर अशा असंख्य शेतकऱ्यांची बँकेत थोडीबहुत जमापुंजी शिल्लक आहे. ही रक्कम वळती करून विम्यापोटी जमा करण्यास बँक व्यवस्थापन नकार देत आहे. एकतर रक्कम मागूनही दिली जात नााही आणि खात्यावर असतानाही ती वळती करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा हा प्रकार आहे. (वार्ताहर)पंचक्रोशीतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची खाती असलेल्या लाभार्थ्यांना पैसे देण्यापुरतेच आता बँकेचे काम उरले आहे. जिल्हा बँकेच्या शाखा आता केवळ निराधारांच्या रकमा देण्यापुरत्याच काम करीत असून, तेवढाच काय तो निराधारांना आधार आहे. मात्र खात्यावर रक्कमा असतानाही त्यांना त्यांचे पैैसे दिले जात नाहीत. या कारभाराबद्दल कोणीतरी आवाज उठवायला हवा. शेतकऱ्यांची बाजू मांडायला हवी. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. दुष्काळी परिस्थतीत आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेताना बँकेतील त्याच्या खात्यावरील रक्कम वळती करावयास हवी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.