शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

व्यवहार कोटींचा, नोंदणी लाखाची

By admin | Updated: June 12, 2014 01:35 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंद करताना त्याची किंमत कमी दाखविली जात असल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे

सुनील कच्छवे , औरंगाबादमालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंद करताना त्याची किंमत कमी दाखविली जात असल्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क (रजिस्ट्री) खात्याचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. प्रत्यक्षात कोटींचे व्यवहारही अवघ्या काही लाखांमध्ये दाखविले जात आहेत. त्यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात वर्षाकाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क खात्याचे या प्रकारांमुळे सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाजारभाव आणि शासकीय (रेडीरेकनर) दर यातील तफावतीमुळे हा प्रकार घडतो आहे. रजिस्ट्री कार्यालयात कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीची नोंद करताना त्याच्या किमतीच्या तुलनेत नोंदणी व मुद्रांक शुल्क भरावे लागते. ग्रामीण भागासाठी हे शुल्क सहा, तर शहरी भागासाठी ७ टक्के आहे. असंख्य लोक हे शुल्क कमी लागावे यासाठी घर, जमीन किंवा शेतीच्या व्यवहारांची नोंद करताना ती कमीत कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही व्यवहारासाठी शासकीय (रेडीरेकनर) दराइतकीच किंमत दाखविली जात आहे.शासनातर्फे दरवर्षी जमिनीचे दर निश्चित केले जातात; पण सध्याच्या मालमत्तांच्या वाढलेल्या किमती आणि रेडीरेकनर दरात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी २०-२० लाख रुपये जमिनीची किंमत असताना त्याच ठिकाणचा रेडीरेकनर दर हा अवघा दोन-चार लाख रुपये एवढाच आहे. परिणामी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात या विभागाला २६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. बाजारभाव आणि शासकीय दर यातील तफावत कमी असती तर हा महसूल ४०० कोटी रुपयांपर्यंत गेला असता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चाळीस गावांतील जमिनींचे दर वाढणारबुडणारा महसूल वसूल करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयाने उपाययोजना सुरू केली आहे. सध्या शहरालगतच्या काही गावांमध्ये बांधकामे वाढली आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी या गावांमध्ये गृहप्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे तेथील घर आणि जमिनींच्या किमती वाढल्या आहेत. हे लक्षात घेऊन रजिस्ट्री कार्यालयाने या गावांमधील रेडीरेकनरचे दर वाढविण्याची शिफारस नगररचना कार्यालयाला केली आहे. औरंगाबाद तालुक्यात हैदराबाद येथील कंपनीने काही जमीन खरेदी केली. त्यासाठी मध्यस्थामार्फत शेतकऱ्यांशी बाँडवर जमीन खरेदीच्या इसारपावत्या करण्यात आल्या. कंपनीने शेतकऱ्यांना एकरी २० ते २५ लाख रुपये भाव दिला. अनेक शेतकऱ्यांना चार चार एकरसाठी एक कोटी रुपये मिळाले; मात्र प्रत्यक्षात रजिस्ट्री कार्यालयात नोंदणी करताना अवघी दोन-दोन लाख रुपये दाखवून हे व्यवहार नोंदविले गेले. नगररचना खात्यातर्फे सहायक संचालक कार्यालयाने शहरालगतच्या ४० गावांतील रेडीरेकनर दर वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे. या गावांमध्ये गटनिहाय दर निश्चित करण्यात येणार आहेत. हे दर निश्चित झाल्यास दरवर्षी महसुलात मोठी वाढ होणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी वाय. डी. डामसे यांनी सांगितले.