शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

व्यवहार कोटींचा, नोंदणी लाखाची

By admin | Updated: June 12, 2014 01:35 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंद करताना त्याची किंमत कमी दाखविली जात असल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे

सुनील कच्छवे , औरंगाबादमालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंद करताना त्याची किंमत कमी दाखविली जात असल्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क (रजिस्ट्री) खात्याचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. प्रत्यक्षात कोटींचे व्यवहारही अवघ्या काही लाखांमध्ये दाखविले जात आहेत. त्यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात वर्षाकाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क खात्याचे या प्रकारांमुळे सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाजारभाव आणि शासकीय (रेडीरेकनर) दर यातील तफावतीमुळे हा प्रकार घडतो आहे. रजिस्ट्री कार्यालयात कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीची नोंद करताना त्याच्या किमतीच्या तुलनेत नोंदणी व मुद्रांक शुल्क भरावे लागते. ग्रामीण भागासाठी हे शुल्क सहा, तर शहरी भागासाठी ७ टक्के आहे. असंख्य लोक हे शुल्क कमी लागावे यासाठी घर, जमीन किंवा शेतीच्या व्यवहारांची नोंद करताना ती कमीत कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही व्यवहारासाठी शासकीय (रेडीरेकनर) दराइतकीच किंमत दाखविली जात आहे.शासनातर्फे दरवर्षी जमिनीचे दर निश्चित केले जातात; पण सध्याच्या मालमत्तांच्या वाढलेल्या किमती आणि रेडीरेकनर दरात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी २०-२० लाख रुपये जमिनीची किंमत असताना त्याच ठिकाणचा रेडीरेकनर दर हा अवघा दोन-चार लाख रुपये एवढाच आहे. परिणामी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात या विभागाला २६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. बाजारभाव आणि शासकीय दर यातील तफावत कमी असती तर हा महसूल ४०० कोटी रुपयांपर्यंत गेला असता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चाळीस गावांतील जमिनींचे दर वाढणारबुडणारा महसूल वसूल करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयाने उपाययोजना सुरू केली आहे. सध्या शहरालगतच्या काही गावांमध्ये बांधकामे वाढली आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी या गावांमध्ये गृहप्रकल्प सुरू केले आहेत. त्यामुळे तेथील घर आणि जमिनींच्या किमती वाढल्या आहेत. हे लक्षात घेऊन रजिस्ट्री कार्यालयाने या गावांमधील रेडीरेकनरचे दर वाढविण्याची शिफारस नगररचना कार्यालयाला केली आहे. औरंगाबाद तालुक्यात हैदराबाद येथील कंपनीने काही जमीन खरेदी केली. त्यासाठी मध्यस्थामार्फत शेतकऱ्यांशी बाँडवर जमीन खरेदीच्या इसारपावत्या करण्यात आल्या. कंपनीने शेतकऱ्यांना एकरी २० ते २५ लाख रुपये भाव दिला. अनेक शेतकऱ्यांना चार चार एकरसाठी एक कोटी रुपये मिळाले; मात्र प्रत्यक्षात रजिस्ट्री कार्यालयात नोंदणी करताना अवघी दोन-दोन लाख रुपये दाखवून हे व्यवहार नोंदविले गेले. नगररचना खात्यातर्फे सहायक संचालक कार्यालयाने शहरालगतच्या ४० गावांतील रेडीरेकनर दर वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे. या गावांमध्ये गटनिहाय दर निश्चित करण्यात येणार आहेत. हे दर निश्चित झाल्यास दरवर्षी महसुलात मोठी वाढ होणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी वाय. डी. डामसे यांनी सांगितले.