शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

पावसाच्या उघडिपीमुळे पिके सलाईनवर

By admin | Updated: September 30, 2014 01:24 IST

नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. मागच्या आठवड्यापर्यंत पिके समाधानकारक वाटत होती, परंतुु पावसाने उघडीप दिल्याने तोऱ्यात डोलत असलेली पिकेही आता सलाईनवर आहेत. आजपर्यंत केवळ ४४ टक्के पाऊस झाला असून अजूनही ५६ टक्के पाऊस बरसला नाही़ आतापर्यंत ४१८़३८ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ९५५़ ५५ मि़ मी़ पाऊस पडतो़ कोरड्या दुष्काळाचे सावट असताना आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात ४४़०६ टक्के पाऊस झाला़ ३० आॅगस्टपासून सुरू झालेले पूर्वा नक्षत्र १२ सप्टेंबर रोजी संपले़ त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्रात विशेष पाऊस झाला नाही़ २७ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र सुरू झाले असून हे नक्षत्र ९ आॅक्टोबर पर्यंत हे नक्षत्र राहणार आहे़ त्यानंतर चित्रा हे नक्षत्र सुरू होईल़ ३१ आॅक्टोबरपर्यंत पाऊस सोबतीला आहे़ मागील वर्षी १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ९३८़१५ मि़मी़ पाऊस झाला होता़ तरयंदा मात्र ४१८़३८ मि़ मी़ पावसावरच समाधान मानावे लागत आहे़ गत पंधरा दिवसांपासून पाऊसच नसल्याने खरीप हंगामत शेतकऱ्यांच्या हातचा जातो की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३१ जुलैपर्यंत ७ लाख ४१७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, तर यंदा ३१ आॅगस्टपर्यंत यावर्षी उशिरा झालेल्या पावासामुळे काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने अंदाजे ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. पेरणी झालेली पीके गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने बरी होती परंतु पंधरा दिवसापासून उघडीप असल्याने सोयाबीनसह कापसाची पीके उन्हाने सुकत आहेत.ज्या भागात सिंचनाची व्यवस्था आहे तेथील शेतकरी कृषीपंपाद्वारे, ठिबक सिचंनाद्वारे पाणी देत असले तरी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मात्र पावसाची चिंता लागली आहे. पाऊस पडेल की नाही या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.यापूर्वी अधूनमधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पिके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला तरी खरिपाच्या काही भागातील पिके तारतील अन्यथा खत-बी-बियाणासाठी टाकलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)