शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उघडिपीमुळे पिके सलाईनवर

By admin | Updated: September 30, 2014 01:24 IST

नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

नांदेड : यंदा मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने हजेरी लावूनही ३१ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. मागच्या आठवड्यापर्यंत पिके समाधानकारक वाटत होती, परंतुु पावसाने उघडीप दिल्याने तोऱ्यात डोलत असलेली पिकेही आता सलाईनवर आहेत. आजपर्यंत केवळ ४४ टक्के पाऊस झाला असून अजूनही ५६ टक्के पाऊस बरसला नाही़ आतापर्यंत ४१८़३८ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ९५५़ ५५ मि़ मी़ पाऊस पडतो़ कोरड्या दुष्काळाचे सावट असताना आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात ४४़०६ टक्के पाऊस झाला़ ३० आॅगस्टपासून सुरू झालेले पूर्वा नक्षत्र १२ सप्टेंबर रोजी संपले़ त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्रात विशेष पाऊस झाला नाही़ २७ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र सुरू झाले असून हे नक्षत्र ९ आॅक्टोबर पर्यंत हे नक्षत्र राहणार आहे़ त्यानंतर चित्रा हे नक्षत्र सुरू होईल़ ३१ आॅक्टोबरपर्यंत पाऊस सोबतीला आहे़ मागील वर्षी १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ९३८़१५ मि़मी़ पाऊस झाला होता़ तरयंदा मात्र ४१८़३८ मि़ मी़ पावसावरच समाधान मानावे लागत आहे़ गत पंधरा दिवसांपासून पाऊसच नसल्याने खरीप हंगामत शेतकऱ्यांच्या हातचा जातो की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३१ जुलैपर्यंत ७ लाख ४१७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, तर यंदा ३१ आॅगस्टपर्यंत यावर्षी उशिरा झालेल्या पावासामुळे काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने अंदाजे ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. पेरणी झालेली पीके गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने बरी होती परंतु पंधरा दिवसापासून उघडीप असल्याने सोयाबीनसह कापसाची पीके उन्हाने सुकत आहेत.ज्या भागात सिंचनाची व्यवस्था आहे तेथील शेतकरी कृषीपंपाद्वारे, ठिबक सिचंनाद्वारे पाणी देत असले तरी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मात्र पावसाची चिंता लागली आहे. पाऊस पडेल की नाही या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.यापूर्वी अधूनमधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पिके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला तरी खरिपाच्या काही भागातील पिके तारतील अन्यथा खत-बी-बियाणासाठी टाकलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)