शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पीककर्ज योजना; बोलाचीच कढी...

By admin | Updated: July 20, 2014 00:36 IST

सोनपेठ : राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून १ लाख रुपये बिनव्याजी व ३ लाख रुपयांपर्यंत या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारून पीककर्ज योजना जाहीर केली.

सोनपेठ : राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून १ लाख रुपये बिनव्याजी व ३ लाख रुपयांपर्यंत या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारून पीककर्ज योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील बँकांना सक्तीचे आदेश दिले. परंतु ही पीककर्ज योजना शेतकऱ्यांसाठी बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी, अशी ठरली आहे.आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करून त्यांना अधिकाधिक शेतीतील उत्पादन घेण्यासाठी पीककर्ज योजना जाहीर केली. १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिन व्याजी तर ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले. तशा पद्धतीचे सक्तीचे आदेश परिपत्रकाद्वारे संबंधितांना देण्यात आले. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे एकाही बँकेने शासनाच्या या पीक कर्ज योजनेच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना या फायदेशीर योजनेची माहिती देण्यासाठी वृत्तपत्रात व दूरदर्शनवरून जाहिरात देऊन प्रसिद्धी दिली. परंतु या योजनेसाठी एकाही जागरूक शेतकऱ्याने पाठपुरावा केला नाही. सध्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून देण्यात येत असलेल्या पीक कर्जाला मर्यादा आहेत. लाख रुपये तर सोडाच परंतु २५ हजार कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी करुन हे कर्ज वसूल केले जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत एकवाक्यता नाही. शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पीक कर्जाला भारतीय स्टेट बँकेत गहाणखत करून शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ हजार आर्थिक भूर्दंड बसविला जात आहे. तर स्टेट बँक आॅफ हैदराबादमध्ये गहाणखत करून घेतले जात नाही. १ लाख रुपयांपेक्षा जास्त पीक कर्जाला गहाणखत करून घेण्याचा नियम हैदराबाद बँकेकडे आहे तर या उलट देशातील मोठी असलेल्या भारतीय स्टेट बँकेत उलट चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या पीककर्ज योजनेचा बोजवारा राष्ट्रीयीकृत बँकेकडून केला जात असल्याने सरकारच्या या धोरणाला हरताळ फासण्याची बँकांची ही योजना शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे.