शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

पीककर्ज योजना; बोलाचीच कढी...

By admin | Updated: July 20, 2014 00:36 IST

सोनपेठ : राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून १ लाख रुपये बिनव्याजी व ३ लाख रुपयांपर्यंत या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारून पीककर्ज योजना जाहीर केली.

सोनपेठ : राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून १ लाख रुपये बिनव्याजी व ३ लाख रुपयांपर्यंत या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारून पीककर्ज योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील बँकांना सक्तीचे आदेश दिले. परंतु ही पीककर्ज योजना शेतकऱ्यांसाठी बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी, अशी ठरली आहे.आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करून त्यांना अधिकाधिक शेतीतील उत्पादन घेण्यासाठी पीककर्ज योजना जाहीर केली. १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिन व्याजी तर ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले. तशा पद्धतीचे सक्तीचे आदेश परिपत्रकाद्वारे संबंधितांना देण्यात आले. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे एकाही बँकेने शासनाच्या या पीक कर्ज योजनेच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना या फायदेशीर योजनेची माहिती देण्यासाठी वृत्तपत्रात व दूरदर्शनवरून जाहिरात देऊन प्रसिद्धी दिली. परंतु या योजनेसाठी एकाही जागरूक शेतकऱ्याने पाठपुरावा केला नाही. सध्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून देण्यात येत असलेल्या पीक कर्जाला मर्यादा आहेत. लाख रुपये तर सोडाच परंतु २५ हजार कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी करुन हे कर्ज वसूल केले जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत एकवाक्यता नाही. शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पीक कर्जाला भारतीय स्टेट बँकेत गहाणखत करून शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ हजार आर्थिक भूर्दंड बसविला जात आहे. तर स्टेट बँक आॅफ हैदराबादमध्ये गहाणखत करून घेतले जात नाही. १ लाख रुपयांपेक्षा जास्त पीक कर्जाला गहाणखत करून घेण्याचा नियम हैदराबाद बँकेकडे आहे तर या उलट देशातील मोठी असलेल्या भारतीय स्टेट बँकेत उलट चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या पीककर्ज योजनेचा बोजवारा राष्ट्रीयीकृत बँकेकडून केला जात असल्याने सरकारच्या या धोरणाला हरताळ फासण्याची बँकांची ही योजना शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे.