शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

नगरसेवकांनी लावले मनपाचे दार

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी सोमवारी मनपात आंदोलन केले़ आयुक्तांच्या दालनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले़ त्यानंतर मनपाच्या समोरील बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले़ जवळपास २८ कोटी रुपये शिल्लक असल्याचा दावा करीत सत्ताधारी असलेल्या कांबळे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे़२०१२-१३ ते २०१४ या आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेली रक्कम शिल्लक असतानाही खर्च केली जात नाही, याला आयुक्त सुधाकर तेलंग जबाबदार असल्याचा आरोप कांबळे यांनी केला़ पायाभूत विकास, नगरोत्थान आदी योजनेमधील २८ कोटी ८४ लाख रूपये शिल्लक असतानाही किरकोळ कामांसाठी मनपाकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे़ प्रभागातील जलवाहिनीचा पाईट फुटला, व्हॉल्व लिकेज झाले तर नागरिकांची ओरड वाढते, त्यासाठी खिशातून पैसे घालण्याची वेळ आली असल्याचे लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले़ निधी खर्च होत नसल्यामुळे मी मनपाला कुलुप लावणार होते, परंतू बांधकाम सभापती गिरीष पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळे कुलूप लावले नाही़ मनपात कसल्याही प्रकारचे नियोजन नाही़ जवळपास एक तास काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, किशोर राजुरे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेना गटनेत्या सुनिता चाळक, राष्ट्रवादीचे राजा मणियार हे प्रवेशदारात बसले होते़ यावेळी चंद्रकात चिकटे म्हणाले, प्रशासन आणि महापौर यांच्यात ताळमेळ नाही़ २८ कोटी ८४ लाख रूपये खर्च न केल्याने पडून आहेत़ (प्रतिनिधी)