शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

५० टक्के कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन, तरीही रुग्णालयांत बेड मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:22 IST

corona virus in Aurangabad : एकीकडे कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना, गंभीर रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देइतर जिल्ह्यांतील गंभीर रुग्ण उपचारासाठी शहरात खासगी रुग्णालये रुग्णांची संख्या देण्यास तयार नाहीत

औरंगाबाद : शहरात १० हजार ९१५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये घरी थांबलेले आहेत. शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असतानाही शहरात सध्या कोठेही गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. शहरात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यासह खान्देश आणि नाशिकपर्यंतचे रुग्ण येत आहेत. इतर जिल्ह्यांतील रुग्णांची माहिती खासगी रुग्णालये महापालिकेला देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

मार्चच्या प्रारंभापासून शहर आणि परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे. शंभरातील ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे प्रशासनाने वारंवार सांगितले. आजची परिस्थिती आहे त्यात सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिकट होण्याचा अंदाज आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. शहरात दररोज दहा हजार नागरिकांची तपासणी, महिनाभरात २ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

एकीकडे कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना, गंभीर रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील खासगी रुग्णालये बेड उपलब्धच नसल्याचे राजरोसपणे सांगत आहेत. यासंदर्भात माजी महापौर बापू घडामोडे यांनी गुरुवारी सोशल मीडियावर खासगी रुग्णालयांच्या वागणुकीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शहरात ५० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना, एवढी विदारक अवस्था झालेली आहे. खासगी रुग्णालयांनी, दररोज किती बेड रिकामे आहेत, त्याचा अहवाल महापालिकेला दिला पाहिजे. पण तो सुद्धा दिला जात नाही.

इतर जिल्ह्यांतील रुग्ण शहरातखासगी रुग्णालयांमध्ये मराठवाड्यासह खान्देश आणि नाशिकपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. अशा रुग्णांची संख्या जवळपास एक हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. महापालिकेने खासगी रुग्णालयांना इतर जिल्ह्यांतील रुग्णांची आकडेवारी कळवावी, असे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत एकाही रुग्णालयाने आकडेवारी दिलेली नाही.

५० ते ७५ हजार रुपये ॲडव्हान्स भराखासगी रुग्णालयांमध्ये काही विशिष्ट नागरिकांच्या माध्यमातून बेड मिळत आहेत. रुग्णास दाखल करण्यापूर्वी ५० ते ७५ हजार रुपये ॲडव्हान्स भरून घेतले जात आहेत. रुग्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत संपूर्ण बिल किमान दोन लाखांपर्यंत जात आहे, हे विशेष!

प्रत्येक रुग्णाला पीपीई कीटचा खर्चखासगी रुग्णालयात डॉक्टरने परिधान केलेल्या पीपीई कीटचा खर्च प्रत्येक रुग्णाच्या बिलात लावण्यात येत आहे. मागीलवर्षीही खासगी रुग्णालयांच्या या अनागोंदी कारभाराबाबत शासनाने गंभीर दखल घेतली होती. खासगी रुग्णालयांच्या बिल तपासणीसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद