शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ग्राहक संरक्षण समितीने दिला न्याय

By admin | Updated: December 24, 2014 01:01 IST

लातूर : ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत असून या समितीकडे गेल्या ४ महिन्यांत ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़

लातूर : ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत असून या समितीकडे गेल्या ४ महिन्यांत ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ त्यापैकी ३४ तक्रारींचा निकाल लावण्यात आला असून, अन्य तक्रारी संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्यात आल्या आहेत़ पैसे देऊन सेवा देणाऱ्या एजन्सीकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर ही समिती कार्यरत आहे़ दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी समितीची बैठक होऊन तक्रारीचा निकाल जाग्यावर देण्याचा प्रयत्न समितीचा राहिला आहे़१९८६ च्या अधिनियमानुसार २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ या अधिनियमानुसारच ग्राहकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण समिती स्थापन झाली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीचे सचिव पुरवठा अधिकारी आहेत़ तर अन्य १७ सदस्य अशासकीय आहेत़ या समितीकडे ग्राहकांकडून तक्रार आल्यास त्यावर चर्चा करुन निर्णय दिला जातो़ ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधीत यंत्रणेला जबाबदार धरुन ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न समिती करते़ या समितीअंतर्गत पैसे घेऊन सेवा देणारे वेगवेगळे १० विभाग आहेत़ त्यामध्ये महावितरण, डाक विभाग, दूरसंचार मंडळ, महानगरपालिका, बँका, अन्न व औषधी प्रशासन, पुरवठा विभाग, वजन मापे आदी विभागांचा समावेश आहे़ गेल्या ४ महिन्यात तक्रारीच्या अनुषंगाने १९८६ कायद्याअंतर्गत अनेक विभागांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत़ सेवाकर घेणाऱ्या मनपालाही कचऱ्याच्याच्या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध रस्त्याबाबत तक्रार होती़ त्यासंदर्भातही ग्राहक संरक्षण समितीने नोटीस बजावली आहे, अशी माहिती जिल्हा ग्राहक सरंक्षण समितीचे अशासकीय सदस्य अ‍ॅड़ महेश ढवळे यांनी दिली़ ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्याला दाद मागण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, ग्राहक मंच, ग्राहक सल्लागार, ग्राहक आयोग या संस्था कार्यरत आहेत़ त्यांच्याकडून ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो़ शासनानेच याचे गठन केले असून, ग्राहक जागरुकता करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत़ ग्राहक जागरुकता व दिशाभूल असे घोषवाक्य निश्चित करुन २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्राहक जागरुकता सप्ताह जिल्ह्यात साजरा होणार असल्याची माहिती जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव यांनी दिली़ (प्रतिनिधी)