शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

काँग्रेस जिंकली, भाजपा हरली, राष्ट्रवादी तरली

By admin | Updated: January 21, 2015 01:10 IST

मधुकर सिरसट ,केज सोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले

मधुकर सिरसट ,केजसोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. देशात, राज्यात आणि केज विधानसभेच्या आमदार भाजपचे असतानाही त्यांना सत्ता मिळविता आली नाही.पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपासाठी अनुकुल असलेल्या नेत्यांना वातावरणाचा लाभ मिळविता आला नाही. पक्षांतर्गत बंडखोरीच्या उमेवारांमुळे या निवडणुकीत भाजपाला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले तर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वास टाकलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांना फक्त दोन जागा मिळाल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत तरली आहे. केज नगरपंचायतीची निवडणूक मराठवाड्यात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत डिजिटल बॅनर, ध्वनीक्षेपकाचा सुमार वापर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. प्रा. संगीता ठोंबरे यांच्या जाहीरसभांनी वातावरण ढवळून गेले होते. गेल्या पंचवार्षिक कालावधीपैकी शेवटची अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता नगर पंचायतवर होती. याच काळात खा. रजनी पाटील यांनी स्वत:चा दोन कोटीचा खासदार निधी आणि तत्कालिन मुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडून केजच्या विकास कामांसाठी मिळविलेल्या ११ कोटींचा निधी या भरीव निधीमुळे काँग्रेसने केज शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राज्य महामार्गावरील रस्ता दुभाजक, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज, भगवानबाबा चौक, भवानी चौकाचे सुशोभिकरण व हायमास्ट दिव्याची झळाळी यामुळे केज शहर उजळून गेले होते. रस्ते, नाल्या, अग्नीशामक दलाची गाडी, घरोघरी घंटागाडीची सुविधा अशा विविध कामांमुळे काँग्रेसबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. खा. रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला व आगामी जाहीरनाम्याचा पाढा वाचला. व्यापारी संकुलासाठी फलोत्पादन खात्याची जमीन हस्तांतर करण्यासाठी झालेला प्रयत्न हे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडले. माजी मुख्यमंत्री चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जाहीरसभेमुळे मतदारात वातावरण निर्मिती झाली आणि या निवडणुकीत सर्वात जास्त आठ जागा जिंकून काँग्रेसने मुसंडी मारली. देशात, राज्यात भाजपाचे सरकार असल्याने हे वातावरण भाजपा उमेदवारांसाठी अनुकूल होते. परंतु उमेदवारी देण्याच्या कारणावरून गटबाजीचे प्रदर्शन झाले. आ. संगीता ठोंबरे यांच्या गटाला एकही उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले रमेश आडसकर आणि हारूण इनामदार या दोघांच्या गटात जागांची विभागणी झाल्यामुळे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. ऐनवेळी जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अंतर्गत गटबाजी झाली.