शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

काँग्रेस जिंकली, भाजपा हरली, राष्ट्रवादी तरली

By admin | Updated: January 21, 2015 01:10 IST

मधुकर सिरसट ,केज सोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले

मधुकर सिरसट ,केजसोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. देशात, राज्यात आणि केज विधानसभेच्या आमदार भाजपचे असतानाही त्यांना सत्ता मिळविता आली नाही.पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपासाठी अनुकुल असलेल्या नेत्यांना वातावरणाचा लाभ मिळविता आला नाही. पक्षांतर्गत बंडखोरीच्या उमेवारांमुळे या निवडणुकीत भाजपाला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले तर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वास टाकलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांना फक्त दोन जागा मिळाल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत तरली आहे. केज नगरपंचायतीची निवडणूक मराठवाड्यात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत डिजिटल बॅनर, ध्वनीक्षेपकाचा सुमार वापर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. प्रा. संगीता ठोंबरे यांच्या जाहीरसभांनी वातावरण ढवळून गेले होते. गेल्या पंचवार्षिक कालावधीपैकी शेवटची अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता नगर पंचायतवर होती. याच काळात खा. रजनी पाटील यांनी स्वत:चा दोन कोटीचा खासदार निधी आणि तत्कालिन मुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडून केजच्या विकास कामांसाठी मिळविलेल्या ११ कोटींचा निधी या भरीव निधीमुळे काँग्रेसने केज शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राज्य महामार्गावरील रस्ता दुभाजक, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज, भगवानबाबा चौक, भवानी चौकाचे सुशोभिकरण व हायमास्ट दिव्याची झळाळी यामुळे केज शहर उजळून गेले होते. रस्ते, नाल्या, अग्नीशामक दलाची गाडी, घरोघरी घंटागाडीची सुविधा अशा विविध कामांमुळे काँग्रेसबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. खा. रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला व आगामी जाहीरनाम्याचा पाढा वाचला. व्यापारी संकुलासाठी फलोत्पादन खात्याची जमीन हस्तांतर करण्यासाठी झालेला प्रयत्न हे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडले. माजी मुख्यमंत्री चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जाहीरसभेमुळे मतदारात वातावरण निर्मिती झाली आणि या निवडणुकीत सर्वात जास्त आठ जागा जिंकून काँग्रेसने मुसंडी मारली. देशात, राज्यात भाजपाचे सरकार असल्याने हे वातावरण भाजपा उमेदवारांसाठी अनुकूल होते. परंतु उमेदवारी देण्याच्या कारणावरून गटबाजीचे प्रदर्शन झाले. आ. संगीता ठोंबरे यांच्या गटाला एकही उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले रमेश आडसकर आणि हारूण इनामदार या दोघांच्या गटात जागांची विभागणी झाल्यामुळे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. ऐनवेळी जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अंतर्गत गटबाजी झाली.