शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

माघारीसाठी रात्रभर मनधरणी

By admin | Updated: October 1, 2014 00:40 IST

औरंगाबाद : नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी आजची सहावी माळ राजकीय वर्तुळात लक्षात राहणारी ठरली.

औरंगाबाद : नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी आजची सहावी माळ राजकीय वर्तुळात लक्षात राहणारी ठरली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे या प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आणल्यामुळे एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला सुरुंग लागला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, तर थोड्याफार मतांचा फायदा होईल. या अनुषंगाने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने नवरात्रात जागरण केले. माघार घेण्यासाठी ३० सप्टेंबरच्या रात्रभर उमेदवारांच्या मागे अक्षरश: धावाधाव सुरू होती. १ आॅक्टोबर हा दिवस उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सहाव्या माळेच्या रात्रीत ज्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली, ते बुधवारी अर्ज मागे घेतील, असाच त्याचा सरळसरळ अर्थ होईल. तो अपक्ष उमेदवार याच्या संपर्कात आहे, तर तो उमेदवार अमुकअमुक उमेदवाराच्या संपर्कात आहे. फलाणा उमेदवार त्यांच्या घरी आहे. याची त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यांची बोलणी फिसकटली आहे. त्याला तर साहेबांचा फोन आला होता म्हणे, या व अशा खमंग, रंगतदार चर्चा बहुतांश सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यालयात आज सुरू होत्या. अपक्ष, बंडखोर, विशिष्ट समाजाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून उद्या १ आॅक्टोबर रोजी माघार घ्यावी, यासाठी आज रात्रभर शहराबाहेर ‘ऊठबशी’चे राजकारण सुरू होते. लग्नाच्या देवाण-घेवाणीवरून होणाऱ्या बैठकीत जसे रुसवे-फुगवे होतात, त्याप्रमाणे ‘वर’ पक्षाच्या भूमिकेत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी अनेक उमेदवारांना कात्रीत पकडले होते. आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकपद देण्याचा शब्दही अनेकांना देण्यात आला. पहाटेपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी या ना त्या मध्यस्थामार्फत प्रयत्न सुरू होते. नऊ मतदारसंघांत कोणाच्या गळाला किती मासे लागले. याचे उत्तर १ आॅक्टोबर रोजी मिळणार आहे.