शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रंग-लोगो ठरेना; म्हणून सिटी बस येईना

By admin | Updated: April 3, 2015 00:41 IST

हणमंत गायकवाड ,लातूर नव्या वर्षाची नवी भेट म्हणून गाजावाजा केलेल्या सिटी बस प्रकल्पाला दीड-पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे़

तरीही सिटी बस लातूरकरांच्या सेवेत धावलेली नाही़ निविदा प्रक्रियेतच सिटी बसचा प्रकल्प अडकला आहे़ ९० टक्के केंद्र व १० टक्के राज्य शासनाच्या ३६ कोटी ८९ लाखांच्या मदतीने सिटी बसचा महत्वकांक्षी प्रकल्प आतापर्यंत सेवेत यायला हवा होता़ मात्र स्थानिक प्रक्रिया पूर्ण करण्यास मनपाला वेळ मिळाला नाही़ रंग आणि लोगो न कळविल्याच्या चिल्लर कारणांमुळे सिटी बसला मुहूर्त लागेना झाला आहे. यासाठी समिती नेमली पण तीन महिन्यांपासून मनपाच्या या समितीला बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही़ परिणामी, बसचा पुरवठा रखडला आहे.

३१ डिसेंबर २०१३ रोजी लातूर मनपाला केंद्र शासनाकडून सिटी बसचा प्रकल्प मंजूर झाला़ त्यावेळी लातूर शहरात नव्या वर्षाची नवी भेट म्हणून मोठमोठ्या होर्डिंग मनपाने लावल्या होत्या़ आमदार, महापौरांसह आयुक्तांचे छायाचित्र असलेल्या या कटआऊटवर लातूरकरांना सिटी बसची नवी भेट म्हणून गाजावाजा केला गेला़ आज त्याला पावणेदोन वर्षांचा कालावधी उलटला, मात्र ही भेट लातूरकरांना अद्याप मिळाली नाही़ निविदा प्रक्रियेद्वारे सिटी बस खरेदीचे टेंडर पास झाले आहे़ पहिल्या टप्प्यात ३० सिटी बस खरेदीला मनपाने मंजुरी दिली़ अशोक लिलॅन्ड, टाटा मोटार्स आणि अ‍ॅलो या कंपनीला ही निविदा पास झाली. संबंधीत कंपनीने सिटी बस खरेदी केल्या़ कंपनीने सिटी बसला कोणता रंग असावा, त्यावर कुठला लोगो असावा, यासंदर्भात मनपाकडून माहिती मागविली़ या बाबीलाही तीन महिने उलटले़ अद्याप रंगसंगती व लोगोबाबत मनपाने संबंधीत कंपनीला माहिती कळविली नाही़ बसची रंगसंगती कोणती असावी, यासंदर्भात महापौरांनी १३ नगरसेवकांची एक समिती गठीत केली आहे़ समिती सदस्यांना रंग कळविण्याबाबत लेखी माहिती मागितली आहे़ मात्र सदस्यांनी बैठक घेऊन चर्चेद्वारे रंग फायनल करावा, असे मत नोंदविले आहे़ परंतु समिती सदस्यांची रंगसंगती ठरविण्यासाठी बैठकच झाली नाही़ त्यामुळे सिटी बस पुरवठाधारक कंपन्यांकडेच आहेत़ रंगसंगती व लोगो फायनल करण्यासाठी मनपात अद्याप एकमत झाले नाही़ त्यामुळे बसेस आलेल्या नाहीत़ सिटी बसची सेवा देण्यासाठी वाहक, चालक, दुरुस्ती, देखभाल या बाबींचेही टेंडर निघणार आहे़ त्यालाही मुहूर्त लागलेला नाही़ चालकांचे डेंटर वेगळे असणार आहे़ वाहकांचेही टेंडर वेगळेच असेल़ परंतु या टेंडरबाबत मनपाच्या अद्याप हलचाली नाहीत़ त्यामुळे हा मोठा प्रकल्प परत जाण्याची भिती आहे़ महापौरांना गांभीर्य नाही, त्यामुळे आयुक्तही गांभीर्याने घेत नाहीत़ केवळ आणि केवळ निविदा प्रक्रियेत हा प्रकल्प आहे़ सेवेत कधी येईल, याची खात्री ना आयुक्त देतात ना महापौऱ सिटी बसची योजना तोट्यात निघेल अशी शंका महानगरपालिकेला सुरुवातीपासूनच आहे़ त्यामुळे मनपाने ६० ऐवजी ३० बसेसच्या टेंडरला मान्यता दिली़ अशा अनेक अडचणीत सिटी बसचा प्रकल्प अडकला आहे़ या अडचणी सोडविण्यासाठी सध्यातरी मनपाला अपयशच आहे. सिटी बसची योजना दोन वर्षांपासून रखडली आहे़ त्याला सत्ताधारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत़ कंपनीला बसचा रंग कळविण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी गेला आहे़ तरीही रंग कळविण्यात आला नाही़ या समितीची बैठकच झाली नाही़ सदस्यांनी पत्राद्वारे रंग कळविणे बेकायदेशीर आहे, असे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ सिटी बस प्रवाशांच्या दिमतीला आल्यानंतर तांत्रिक देखभाल करण्याचे नियोजन या प्रकल्पात आहे़ आयटीएस सॉफ्टवेअर विकसीत करुन रस्त्यावर धावत असलेल्या बसेसचे नियंत्रण करणे तांत्रिक देखभालीत आहे़ मात्र ही निवीदाही निघालेली नाही़ ती काढण्यासाठी मनपा बेफिकीर आहे़ वाहनतळाची निश्चिती नाही, मार्ग निश्चिती नाही, थांबे निश्चित नाहीत, केंद्रीय बसस्थानकाची निश्चिती नाही, शहर बसस्थानक नाही, वर्कशॉप नाही, या सर्व बबींची पूर्तता कधी होणार आणि सिटी बस कधी धावणार हे कुणीही निश्चित सांगू शकत नाही़ दीड वर्षांपूर्वीची योजना असल्यामुळे आता त्यात २० टक्के तूट होऊ शकते़ ३६ कोटी ८९ लाखांच्या या योजनेत सध्याच्या खर्चानुसार २० टक्के वाढ केली तर याची रक्कम वाढते़ त्यामुळे पुरवठाधारक कंपनी रक्कम वाढवून मागू शकते़