वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारी अयोध्यानगर नाल्यालगत असलेल्या नालीची सफाई करून ड्रेनेज व सांडपाण्याची विल्हेवाट लावली. अनेक दिवसांपासून दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरिकांची अखेर दुर्गंधीतून सुटका झाल्याबद्दल लोकमतचे आभार मानले आहेत.अयोध्यानगरातून वाहणाऱ्या नाल्यालगत बजाजनगरात नाली तुंबल्याने ड्रेनेज व सांडपाणी उघड्यावरच साचले होते. अनेक वेळा सांगूनही एमआयडीसी प्रशासन नालेसफाईकडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत होता. लोकमतने वृत्त प्रकाशित करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मांडला होता. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एमआयडीसी प्रशासनाने तुुंंबलेल्या नालीची साफसफाई केली व साचलेल्या ड्रेनेज आणि सांडपाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारी बजाजनगरातील तुंबलेल्या नालीची साफसफाई करून सांडपाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिल्याने नागरिकांची दुर्गंधीतून सुटका झाली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने दोन दिवसांत नाल्याची साफसफाई केली. लोकमतमुळे या भागातील नागरिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे, असे माजी ग्रा.पं. सदस्य सतीश पाटील, मनिष तोतला, सुशांत भुजंग, अशोक दोमाटे, सिद्राम पारे, सुरेश गाडेकर, अंकुश पुंड, उमेश नवले, मंगेश मुंडे, सचिन हातोळे, अक्षय शिंदे आदींनी सांगितले.
एमआयडीसीकडून नालीची सफाई
By admin | Updated: June 11, 2016 00:16 IST