शांतीलाल गायकवाड , औरंगाबादनवलेखकांची गुणवत्ता हेरून त्यांना संधी देणे, विस्मृतीत गेलेल्या जुन्या अभिजात पुस्तकांच्या आवृत्त्या काढणे व पुनर्प्रकाशित करणे, बालसुलभ भावना जपणारी बालसाहित्य निर्मिती, नवसाक्षरांसाठी मासिक चालविणे, हे सर्व करीत असताना वाङ्मयीन सभ्यता जपत वेगवेगळे लक्षवेधी व यशस्वी प्रयोग करणारे महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या साकेत प्रकाशनाचे संस्थापक, केंद्र व राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांसह अनेक नामांकित संस्थांनी गौरविलेले सिद्धहस्त लेखक बाबा भांड यांच्या खांद्यावर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचित.प्रश्न - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्या पदावर काम करण्याची संधी आपणास मिळाली आहे, काय वाटते?उत्तर - मोठ्या संधी सोबतच ही मोठी जबाबदारीही आहे. अनेक दिग्गज, विचारवंतांनी या पदावर काम केले आहे. त्यामुळे या पदाचे मोठेपण आहे. आजच्या बदलत्या अभिरुचीची सांगड अभिजात साहित्याशी घालण्याचा प्रयत्न माझा राहील. ग्रंथव्यवहार हा सामाजिक जबाबदारीचे काम आहे. गेली चाळीस वर्षे साहित्य व्यवहार आम्ही सचोटीने व उच्च दर्जाची गुणवत्ता सांभाळत केला. त्या अनुभवाचा फायदा होईल.प्रश्न - मराठीची वाङ्मयीन संस्कृती कशी जपणार?उत्तर - साहित्य- संस्कृतीविषयक चिंतन करणारे, काम करणारे हे भारतातील राज्य पातळीवरील पहिले मंडळ आहे. मराठी भाषेतील मूलभूत संशोधन प्रकाशनाचे काम या महामंडळाच्या माध्यमातून झाले. या कामाची गती वाढविण्यासह वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालावी लागणार आहे. राज्यभरात पसरलेली हजारो लहान-मोठी ग्रंथालये, पुस्तके, साहित्य वितरित करणारे वितरक, वाचक आणि लेखक ही मंडळी वाङ्मयीन संस्कृती जपून आहे. परंतु इमारतीच्या रूपाने ग्रंथालये उभी राहिली म्हणजे वाचक तयार झाले व होतील, असे नाही. लेखकांना लिहितं करण्यापासून वाचक संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या गोष्टी वाढविणे हा संस्कृतीचा एक भाग आहे.प्रश्न : अध्यक्ष म्हणून मंडळातर्फे कोणत्या प्रकल्प, योजनांवर आपण काम करणार आहात.उत्तर - गेली ५० वर्षे साहित्य व्यवहाराशी मी निगडित आहे. त्यामुळे लेखक, प्रकाशकांच्या अडीअडचणी व वाचकांच्या भावभावना, इच्छा जाणून आहे. त्यामुळे काही प्रकल्प राबविण्याची संकल्पना तयार आहे. विशेषत: सर्जनशील नवलेखनासाठी विभागीय पातळीवर अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळांचे आयोजन करणे, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या शासनाच्या संस्थांना सोबत घेऊन काही लेखन-वाचन प्रकल्प संयुक्त राबविणे, विविध पुरस्कार-बक्षिसे या समित्यांवर दर्जेदार लेखकांना घेऊन नि:पक्ष कलाकृतींची निवड करणे, जुने अक्षर वाङ्मय- अभिजात साहित्याचा शोध घेऊन
वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालू
By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST