शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

शहराला आणखीन २०० शहर बस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस नागरिकांना सेवा देत आहेत. शहरासाठी आणखी २०० बस मिळण्याची शक्यता ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस नागरिकांना सेवा देत आहेत. शहरासाठी आणखी २०० बस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. या योजनेतून शहराला मदत मिळणार असून, यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरु आहे.

शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बससेवा सुरु केली आहे. सध्या शंभर बस या माध्यमातून चालवल्या जातात. केंद्र शासनाने आणखीन दोनशे बसबद्दल नवीन योजना तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहरासाठी आणखी दोनशे बस प्राप्त होऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादचा दोनशे बसचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर करावा, यासाठी खासदार डॉ. इम्तियाज जलील व भागवत कराड यांचीदेखील मदत घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीमधील बससेवा दहा वर्ष सुरू राहील, यादृष्टीने नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाकडून भविष्यात आणखी २०० बसेस मिळाल्या तर वीस वर्षे या सेवेकडे बघण्याची गरज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.