शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

वाढीव बिलामुळे नागरिक हैराण

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

औरंगाबाद : आधी तीन हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होते, आता थेट नऊ हजार रुपये आले... पाच महिन्यांनंतर थेट १ लाख रुपयांचे बिल आले...

औरंगाबाद : आधी तीन हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होते, आता थेट नऊ हजार रुपये आले... पाच महिन्यांनंतर थेट १ लाख रुपयांचे बिल आले... अशा प्रकारे अनेक ग्राहकांनी मंगळवारी वाढीव वीज बिलांबाबत जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत तक्रारी मांडल्या. दिवसेंदिवस ग्राहकांना वाढीव बिल येत असल्याने नागरिक हैराण होत असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले.जिल्हा विद्युकीकरण समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे, आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महावितरण कंपनीचे अधिकारी आदींची बैठकीस उपस्थिती होती. यावेळी वीज बिलातील एलबीटीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता जीटीएलकडून एलबीटी वसूल करण्यात यावा, नागरिकांवर त्याचा भार टाकू नका, ग्राहकांनी यापुढे एलबीटी वगळून वीज बिल भरावे, एलबीटी रद्द झाल्याने आता वीज ग्राहकांना त्रास देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या; परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होईल, असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक तास पुरवठा खंडित राहतो. कॉल सेंटरवरही संपर्क होत नाही, कर्मचारी उद्धट बोलतात, अशा तक्रारी मांडताना महावितरणपेक्षा जीटीएलची सेवा बरी होती, असा अनुभव येत असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. वीज बिल लवकर मिळत नसल्याने एकदम वाढीव बिल आणि व्याज भरण्याची वेळ येत असल्याची तक्रारही यावेळी अनेकांनी केली. शहरात वीज ग्राहकांसाठी जास्तीत जास्त कॉल सेंटर, चौकशी कक्ष, विशेष कक्ष स्थापन करण्याची सूचना करण्यात आली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्याला महावितरणमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली.