शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नव्या वर्षात मिळणार स्वस्त-मस्त भाज्या

By admin | Updated: December 16, 2014 01:07 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प योजनेसाठी औरंगाबाद शहराची निवड केली असून,

औरंगाबाद : केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प योजनेसाठी औरंगाबाद शहराची निवड केली असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेमुळे नव्या वर्षात शहरवासीयांना स्वस्त आणि मस्त भाज्या मिळणार आहेत. शहरात योजना राबविण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. महापालिकेने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना संकरित भाज्या स्वस्त दराने मिळतील. योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाज्या नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. यासाठी शहरात २० ते २५ ठिकाणी भाजीपाला विक्री केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने २०११-१२ च्या अर्थसंकल्पामध्ये नागरी समूहाकरिता भाजीपाला पुरवठा प्रकल्पाची घोषणा केली होती. भाजीपाला पुरवठा प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शहरातील प्रकल्पासाठी राज्यस्तरीय प्रकल्प समितीने ८.५० कोटी रुपये मंजूर केले असून, त्यापैकी ३ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. भाजीपाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून येणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्यामुळे काढणीतोर व्यवस्थापनासाठी पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतवाहन, शीतगृह, कमी ऊर्जा वापरणारे शीतगृह उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प फक्त समूह स्वरूपातच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प ाूधारक शेतकरी, नोंदणीकृत महिला आणि पुरुष बचत गट यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.४या योजनेच्या माध्यमातून दलालांची साखळी मोडीत काढण्यात येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला थेट ग्राहकांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळणार आहे. ४योजनेच्या माध्यमातून विभागातील पाच हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. योजनेसाठी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे उत्पादन करणे शिकविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताज्या भाज्या मिळतील. योजना राबविण्यासाठी सुकाणू समितीची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष कृषी सहसंचालक जे. जे जाधव, सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. डी. लोणारे, सदस्य प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र भोसले, प्रकल्प संचालक शामराव साळुंके, उपसंचालक संतोष आळसे, उपनिबंधक एन.व्ही. अधाने यांच्यासह इतर पंधरा जणांची समितीमध्ये निवड करण्यात आली. या योजनेत २० ते २५ ठिकाणी संकलन व प्रतवारी केंद्र, वितरण केंद्र अशी साखळी उभारण्यात येणार आहे. ४यामध्ये काही ठिकाणी वातानुकूलित तर काही ठिकाणी फिरती विक्री केंद्रे असतील.