शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

कुलगुरूंचा वाढला ताण

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनामानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. हे नसे थोडके म्हणून की काय, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागेवर नेमणूक करण्यासाठी पात्र तीन जणांची नावे पाठवावीत, या आशयाचे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूंना प्राप्त झाले आहे.व्यवस्थापन परिषदेवर यापूर्वी ‘वोखार्ड’ चे वरिष्ठ अधिकारी डॉ. महाराज किशन साहिब हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत होते. दैनंदिन कामकाजामुळे अलीकडे त्यांना व्यवस्थापन परिषदेचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कुलगुरूंकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने उल्हास उढाण यांची आॅगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केली. दोन महिन्यांनंतर उढाण यांच्या नियुक्तीस अधिसभा सदस्य गजानन सानप यांनी आक्षेप घेतला होता. सानप यांच्या आक्षेपाची दखल घेऊन राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार उल्हास उढाण यांना राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अपात्र ठरविले आहे. ते व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यत्वाचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले असून, कुलगुरूंनी उल्हास उढाण यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तीन जणांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १४ सप्टेंबर २००९ च्या अध्यादेशानुसार व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पात्रतेचे निकष ठरविले आहेत. त्या निकषानुसारच तिन्ही नावे पाठविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजी हे पत्र कुलगुरू कार्यालयास पाठविले आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या तीन बैठका विद्यापीठाने घेतल्या आहेत. त्या तिन्ही बैठकांना कुलगुरूंनी रीतसर आपणास निमंत्रित केल्याचे उल्हास उढाण यांचे म्हणणे आहे. आपणास आतापर्यंत अपात्रतेबद्दल कुलगुरूंनी कळविले नसल्याचेही ते म्हणतात. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप गोटातून व्यवस्थापन परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून असल्याची माहितीही समोर आली आहे. १कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे राज्यपाल कार्यालयाच्या पत्राबद्दल खातरजमा करण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.