शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

कुलगुरूंचा वाढला ताण

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनामानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. हे नसे थोडके म्हणून की काय, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागेवर नेमणूक करण्यासाठी पात्र तीन जणांची नावे पाठवावीत, या आशयाचे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूंना प्राप्त झाले आहे.व्यवस्थापन परिषदेवर यापूर्वी ‘वोखार्ड’ चे वरिष्ठ अधिकारी डॉ. महाराज किशन साहिब हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत होते. दैनंदिन कामकाजामुळे अलीकडे त्यांना व्यवस्थापन परिषदेचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कुलगुरूंकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने उल्हास उढाण यांची आॅगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केली. दोन महिन्यांनंतर उढाण यांच्या नियुक्तीस अधिसभा सदस्य गजानन सानप यांनी आक्षेप घेतला होता. सानप यांच्या आक्षेपाची दखल घेऊन राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार उल्हास उढाण यांना राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अपात्र ठरविले आहे. ते व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यत्वाचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले असून, कुलगुरूंनी उल्हास उढाण यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तीन जणांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १४ सप्टेंबर २००९ च्या अध्यादेशानुसार व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पात्रतेचे निकष ठरविले आहेत. त्या निकषानुसारच तिन्ही नावे पाठविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजी हे पत्र कुलगुरू कार्यालयास पाठविले आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या तीन बैठका विद्यापीठाने घेतल्या आहेत. त्या तिन्ही बैठकांना कुलगुरूंनी रीतसर आपणास निमंत्रित केल्याचे उल्हास उढाण यांचे म्हणणे आहे. आपणास आतापर्यंत अपात्रतेबद्दल कुलगुरूंनी कळविले नसल्याचेही ते म्हणतात. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप गोटातून व्यवस्थापन परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून असल्याची माहितीही समोर आली आहे. १कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे राज्यपाल कार्यालयाच्या पत्राबद्दल खातरजमा करण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.