शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

पाणीपुरवठा आणि अतिक्रमणांचे आव्हान

By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST

औरंगाबाद : सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी मिळून नगर परिषद अस्तित्वात आली असून, नव्या नगर परिषदेसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे

औरंगाबाद : सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी मिळून नगर परिषद अस्तित्वात आली असून, नव्या नगर परिषदेसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे. किती दिवसांत पाणी मिळणार या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना हवे आहे. नाल्यांवर तसेच इमारतींचे झालेले बेकायदा बांधकाम हटविण्याचेही मोठे आणि अवघड काम नगर परिषदेला करावे लागणार आहे. मागील दहा वर्षांत सातारा परिसरात स्वतंत्र घरे तसेच अपार्टमेंट इतक्या वेगाने वाढले आहेत की, त्या भागात सोयी-सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेले. वसाहती वाढत असताना ग्रामपंचायतींचे सदस्य मागील दहा वर्षांत केवळ राजकारणात गुंतल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेबांधणी, ड्रेनेजलाईन, विजेच्या दिव्यांची सोय या आवश्यक सुविधा नागरिकांना मिळाल्या नाहीत. जुन्या गावाच्या परिसरात तसेच नव्याने वसलेल्या काही वसाहती वगळल्यास या भागाचा संपूर्ण पाणीपुरवठा हा विंधनविहिरी तसेच खाजगी टँकरच्या भरवशावरच राहिला. सद्य:स्थितीला या दोन्ही गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजार इतकी आहे. मागील तीन वर्षांत ही संख्या आणखी वाढली आहे. सद्य:स्थितीत ही संख्या ६० हजारपेक्षाही जास्त आहे. भारतात पाणी वापराच्या मानकानुसार प्रत्येक नागरिकाला दररोज कमीत कमी १३५ लिटर पाणी मिळायला हवे. त्यामुळे सातारा- देवळाई या नव्या शहराच्या साठ हजार लोकसंख्येला दररोज ८० लाख लिटरपेक्षाही जास्त पाण्याची गरज आहे. नगर परिषद अस्तित्वात आल्याने या भागात साहजिकच नागरिकांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढणार आहे. प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येईपर्यंत या शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास जाईल. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन व्हायला पाहिजे. सातारा- देवळाईसाठी पाणी कोठून मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत मागील काही वर्षांत काहीच हालचाल झालेली नाही. ग्रामपंचायतीकडेही याबाबतचे काही नियोजन नव्हते. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जलवाहिनीतून किंवा नक्षत्रवाडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देता येऊ शकते का, याबाबत विचार होऊ शकतो. मात्र, या प्रश्नाचे उत्तर अधांतरीच आहे. यामुळे नव्या नगर परिषदेसमोर लवकरात लवकर आणि कोणत्या स्रोतातून पाणी मिळणार हे ठरविण्याचे मोठे आव्हान आहे. बेकायदा बांधकामसातारा आणि देवळाई परिसरात नाल्यांवर तसेच ठिकठिकाणी नागरिक व बिल्डरांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाला बुजविल्याचे प्रकरण समोर आले आहे. नगरनियोनाच्या दृष्टीने अतिक्रमण काढणे आणि नैसर्गिक नाले मोकळे करणे हे मोठे आव्हान आहे. सातारा परिसरातील अनेक नाले बुजविण्यात आले आहेत. विद्यमान प्रशासक आणि तहसीलदार विजय राऊत यांना प्रशासकपदाच्या काळात नगर परिषद अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीबरोबरच बेकायदा बांधकामे काढण्याचे आव्हान असणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक होण्यापूर्वीच काही करता आले तर ते शक्य होणार आहे. विद्यमान प्रशासकांनी ते धाडस दाखवावे, अशी नागरिकांची अपेक्षा असणार आहे.