शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महासंकल्प... मांजरा नदीच्या खोलीकरणाचा !

By admin | Updated: April 7, 2016 00:29 IST

लातूर : लातूर शहराच्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी आता लातूरकरच पुढे सरसावले आहेत. आपली नावे, आपल्या संस्था, आपले पक्ष आणि आपले विचार बाजूला ठेवून

लातूर : लातूर शहराच्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी आता लातूरकरच पुढे सरसावले आहेत. आपली नावे, आपल्या संस्था, आपले पक्ष आणि आपले विचार बाजूला ठेवून समस्त लातूरकरांना हाक देण्यात आली आहे. डॉ. अशोक कुकडे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे आणि बी. बी. ठोंबरे या चौघांचे मागदर्शक पॅनल बनविण्यात आले असल्याची माहिती मकरंद जाधव यांनी महाराष्ट्र बायोफर्टिलायझरच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. फक्त ‘पाणी’ या एकाच विषयासाठी तहानलेल्या लातुरातील नानाविध संघटनांचे प्रतिनिधी एक झाले असून, बुधवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेत झालेल्या व्यापाऱ्यांच्या सभेत ४ लाख ५१ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. यामुळे आता ही चळवळ अधिक गतिमान होणार असल्याचेही जाधव म्हणाले.फक्त लातुरातीलच नव्हे तर परदेशात विसावलेल्या अस्सल लातूरकरांनी ‘एनआरआय लातूर’ असा व्हाटस् अ‍ॅप ग्रुप’ बनविला आहे. लातूर माहेर असलेल्या लेकीबाळींना ‘माझ्या माहेरा’साठी म्हणून जमेल तेवढ्या मदतीची हाक दिली आहे. तीन बँकांत खाते उघडण्यात येणार आहे. ‘आपले पाणी आपणच साठवूया’ हा मूलमंत्र घेऊन येत्या ८ मार्चला मांजरा नदीच्या पात्रात १० पोकलेनच्या मदतीने गाळ उपशाच्या महासंकल्पाला सुरुवात होत आहे. अखंड दोन महिने ‘मांजरा’च्या पात्रात चालणाऱ्या या महाअभियानाच्या कृती, निधी आणि वेळ या तिन्ही गोष्टीसाठी लातूरकरांनी मदत करावी, अशी अपेक्षा कुकडे, गोमारे, झंवर आणि ठोंबरे यांनी केली आहे. या महत्त्वकांक्षी लोकचळवळीचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा. सरकारी यंत्रणा काहीतरी करेल यापेक्षा लातूरकरांनीच लातूरकरांच्या पाण्यासाठी प्रयत्न केले तर ? या विचाराने शहरातील काही मंडळी एकत्र आली. तीन मार्च रोजी पहिली बैठक झाली. ज्यात शहरातील साठ लोक उपस्थित होते. दि. पाच एप्रिल रोजी दुसरी बैठक व्यापारी मंडळाची झाली. आणि आता तिसरी बैठक शहरातील ६५ व्यापारी संघटनांची दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात तिसरी बैठक घेऊन एक कृती आराखडा ठरला. एकविचाराचा आणि कामाचाही. डॉ. अशोक कुकडे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर आणि बी. बी. ठोंबरे या वेगवेगळ्या विचारधारा आणि उद्योगातील श्रेष्ठींनी पुढाकार घेऊन याचे नेतृत्व स्विकारीत मार्गदर्शक पॅनलमध्ये बसण्याला मान्यता दिली. आता खाली कामगारांची यादी असंख्य लोकांची. यातला कुणी उद्योजक, कुणी श्री. श्री. परिवाराचा साधक, कुणी शिक्षक, कुणी प्राध्यापक, कुणी ट्रॅव्हल्सवाला, कुणी कँटीनवाला, कुणी व्यापारी, कुणी कारखानदार, कुणी दुकानदार, कुणी पत्रकार, कुणी राजकारणात छोट्या-मोठ्या पदावर तर कुणी संघटनेचा पदाधिकारी. या साऱ्या शे दीडशे लोकांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी केली. ‘मांजरा’ खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी सुरु झालेल्या या चळवळीने ‘जलयुक्त लातूर’ हा एक फलक आपल्या हातात पकडला आहे. (प्रतिनिधी)मांजरा नदीतील गाळ काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात व्यापारी महासंघाच्या विविध असोसिएट्स संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत ४ लाख २३ हजार रुपयांचा निधी संकलित झाला. राज मोटर्सचे अनिल शिंदे यांनी १ लाख ५१ हजार रुपये, बी.बी. ठोंबरे यांनी नॅचरल शुगर्स रांजणीच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपये, राजस्थान विद्यालयाच्या १९७८ च्या बॅचच्या वतीने ५१ हजार रुपये, श्री नाबदे यांनी ५१ हजार रुपये, विशाल अग्रवाल यांनी ५१ हजार रुपये दिल्याची घोषणा केली. हे सगळे मिळून ४ लाख २१ हजार रुपये अवघ्या एका बैठकीत गोळा झाल्याने या चळवळीला चांगलेच बळ मिळाले आहे.यासंबंधीची माहिती देण्यासाठी उद्योग भवनातील ‘एमबीएफ’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत २१ हजारांचा निधी संकलित झाला. पत्रकार रामेश्वर बद्दर यांनी ११ हजार रुपये तर जयप्रकाश दगडे आणि प्रदीप नणंदकर या दोघांनी प्रत्येकी पाच हजाराचा निधी सुपूर्द केला.