शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडीसाठी अल्पवयातच संसाराचे ओझे खांद्यावर !

By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST

संजय तिपाले ,बीड ज्या वयात शिक्षण घ्यायचे, स्वत:चे आयुष्य घडवायचे त्याच वयात ऊसतोडणीसाठी हजारो मुलामुलींच्या खांद्यावर संसाराचे ओझे पडते़ अंगावरील हळद

संजय तिपाले ,बीडज्या वयात शिक्षण घ्यायचे, स्वत:चे आयुष्य घडवायचे त्याच वयात ऊसतोडणीसाठी हजारो मुलामुलींच्या खांद्यावर संसाराचे ओझे पडते़ अंगावरील हळद अन् हातावरील मेहंदी पुसण्याआधीच सुखी संसाराची स्वप्ने उराशी घेऊन नव्या जोडप्यांना कोयता उचलावा लागतो़ कमी वयात विवाह झाल्याने माता व बालकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच शिवाय काहीवेळा गुंतागुंत वाढून जीवही गमवावा लागतो़ जिल्ह्यात अल्पविवाहाचे प्रमाण ३६ टक्के इतके असून माता व अर्भकमृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे़ऊसतोड कामागारांच्या बीड जिल्ह्यात सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना कोयत्याप्रमाणे उचल दिली जाते़ पती- पत्नीचा मिळून एक कोयता असे ढोबळ गणित मांडून मजूर ऊसतोडणीचे काम करतात़ उचलीसाठी कोयत्याचा ‘कोरम’ पूर्ण व्हावा, यासाठी मजूर कुटुंबिय मुलामुलींची लग्ने अल्पवयातच उरकतात़ कमी वयात संसाराचे ओझे पेलवताना जोडप्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो़ मुलांपेक्षा मुलींचे कमी वयात विवाह होण्याचे प्रमाण अधिक आहे़ जिल्ह्यात शंभरपैकी ३६ मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आत होतात़ राज्याचे प्रमाण १८ टक्के इतके असून त्यापेक्षा दुप्पट प्रमाण हे एकट्या बीड जिल्ह्याचे आहे़ स्थानिक ठिकाणीच रोजगार हवाबालविवाहांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी ऊसतोडीचा कलंक पुसून स्थानिक पातळीवर छोट्या उद्योगांची भरभराट होणे गरजेचे आहे़ मागेल त्याला काम अशी घोषणा करत शासनाने रोजगाराच्या हमीची योजना आणली;परंतु तरीही सहा लाखांवर मजुरांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे़ श्रमशक्ती येथेच राहिली तर जिल्ह्याच्या विकासालाही गती येईल़ बालविवाह थांबविण्याचे काम प्रशासनाचे असले तरी त्यासाठी सामाजिक व आर्थिक स्थैर्य देखील आवश्यक आहे़ जोपर्यंत स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत बालविवाहांसारख्या प्रथांना शंभर टक्के रोख लावणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली़