शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कर्मचाऱ्यांअभावी रक्तविलगीकरण केंद्राला खीळ

By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST

उस्मानाबाद : जिल्हा रूगणालयातील रक्तविलगीकरण केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही यंत्रणा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांअभावी खीळ बसत आहे़

उस्मानाबाद : जिल्हा रूगणालयातील रक्तविलगीकरण केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही यंत्रणा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांअभावी खीळ बसत आहे़ बदलीनंतर आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध होवू न शकल्याने केवळ यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे़ त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांची प्लाझमासह प्लेटलेट, पीसीव्ही इतर बाबींसाठी हेळसांड पूर्ववत सुरूच आहे़समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा रूग्णालयात रक्तविलगीकरण केंद्र सुरू होणार असल्याने रूग्णांसह नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत होते़ या रक्तविलगीकरण केंद्रास शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी जवळपास दीड-दोन वर्षे पाठपुरावा करण्यात आला आहे़ यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली असून, सेंन्ट्रीफ्यूज मशीन, प्लाझमा एक्सप्रेसर, प्लेटलेट अ‍ॅझिटेटर आदी आवश्यक त्या यंत्रणाही उभारण्यात आल्या आहेत़ या बाबींची दिल्ली येथील टीमने पाहणी केल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे गेला होता़ त्यानंतर दिल्ली येथील एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) प्रस्तावास मंजुरी देवून परवाना दिला आहे़ जिल्हा रूग्णालयास परवाना मिळून महिन्याचा कालावधी लोटला तरी केवळ चाचणी करून ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे़ येथील रक्तसंकलन विभागात ०६ पैकी तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ तर एक प्रशिक्षणासाठी गेला आहे़ दोन कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले असून, एकाची बदली झाली असली तरी तो तेथेच कार्यरत आहे़ सर्व यंत्रणा उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांअभावी ही यंत्रणा धूळ खात पडली असून, रूग्णांसह नातेवाईकांची फरफट कायम आहे़ (प्रतिनिधी)