शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

भाजपा कार्यकर्त्यांना ऊर्जा

By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST

लातूर : गोपीनाथ मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम केले. ते नेहमीच शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे. आज गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळेच दिसले असते.

लातूर : गोपीनाथ मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम केले. ते नेहमीच शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे. आज गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळेच दिसले असते. त्यांच्या विचाराला जपणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज कार्यरत आहे. भाजपाचे लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांना निवडून देऊन विकासकामे करण्याची संधी द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ममदापूर येथे केले.लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सभा झाली. या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. यावेळी उत्तराखंडचे माजी मंत्री अजय भट, देवेंद्रसिंह रावत, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भाजपा लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार शैलेश लाहोटी, ओमप्रकाश गोडभरले, दिलीप देशमुख, नवनाथ भोसले, हणमंत नागटिळक, श्रीकिशन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, महाराष्ट्रात आघाडी शासनाने अनेक घोटाळे केले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवस्था बिकट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. जन-धन योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.लातूर ग्रामीणचे भाजपाचे उमेदवार रमेश कराड म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जनतेची दिशाभूल करून स्वत:चाच विकास करून घेतला. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वीज आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण मतदारसंघात दादा काढून नानाला आणले. काँग्रेसने सत्तेचा उपयोग मर्जीतील लोक सांभाळण्यासाठीच केला. त्यांच्या जुलमी राजवटीला जनता कंटाळली आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी आपल्याला मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)