शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भाजपा कार्यकर्त्यांना ऊर्जा

By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST

लातूर : गोपीनाथ मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम केले. ते नेहमीच शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे. आज गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळेच दिसले असते.

लातूर : गोपीनाथ मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम केले. ते नेहमीच शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या प्रश्नांवर चर्चा करायचे. आज गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळेच दिसले असते. त्यांच्या विचाराला जपणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज कार्यरत आहे. भाजपाचे लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांना निवडून देऊन विकासकामे करण्याची संधी द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ममदापूर येथे केले.लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सभा झाली. या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. यावेळी उत्तराखंडचे माजी मंत्री अजय भट, देवेंद्रसिंह रावत, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भाजपा लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार शैलेश लाहोटी, ओमप्रकाश गोडभरले, दिलीप देशमुख, नवनाथ भोसले, हणमंत नागटिळक, श्रीकिशन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, महाराष्ट्रात आघाडी शासनाने अनेक घोटाळे केले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवस्था बिकट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. जन-धन योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.लातूर ग्रामीणचे भाजपाचे उमेदवार रमेश कराड म्हणाले, गेल्या ६० वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जनतेची दिशाभूल करून स्वत:चाच विकास करून घेतला. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वीज आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण मतदारसंघात दादा काढून नानाला आणले. काँग्रेसने सत्तेचा उपयोग मर्जीतील लोक सांभाळण्यासाठीच केला. त्यांच्या जुलमी राजवटीला जनता कंटाळली आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी आपल्याला मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)