शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

दुचाकी ढकल मोर्चा

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत आंदोलन केले़

उस्मानाबाद : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी दुचाकी ढकलत नेत अनोखे आंदोलन केले़ यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते़कळंब येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली येथील ढोकी नाका येथून या आंदोलनास प्रारंभ झाला़ ही रॅली शिवाजी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गे केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत दुचाकी ढकलत नेण्यात आली़ या आंदोलनात विलास करंजकर, विशाल बारसकर, अनंत घोगरे, तय्यब हाश्मी, सुझानंद वरपे, सुभाष वाघमारे, संजय गरड, समीर बागवान, विजय गायकवाड, बाळासाहेब शेळके, प्रकाश भोसले, पृथ्वीराज देशमुख, दिग्विजय पाटील, बाळू लोकरे, मुनीर पठाण, संजय सोनवणे, प्रशांत घोगरे, रवि पुरी, सागर घोगरे, सुनील पाटील, अनंत बारटक्के, गजानन मुंडे, राहुल वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़उमरगा येथे राष्ट्रीय महामार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, प्रा़डीक़ेक़ांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेवक विजय दळगडे, अतिक मुन्शी, सतीश सुरवसे, विजय वाघमारे, राम धोत्रे, सुभाष घोडके, कमलाकर मंमाळे, आयुब जमादार, प्रदीप गिरीबा, महेश माशाळकर, बाळू परांडे, चंद्रशेखर पवार, बंडू पवार, अजय वाघमारे, शिवा मुरमे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मोदी सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेकतुळजापूर : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आहे. दरवाढ कमी करण्याऐवजी वाढविली जात आहे. पेट्रोल, डिझेल भाववाढ आणि रेल्वेची भाडेवाढ करुन तर प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप तुळजापूर येथील आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विसर पडू लागला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसोबतच रेल्वे भाडेवाढही मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य नागरीक महागाईच्या कचाट्यात सापडला आहे. ही सर्व दरवाढ आणि भाडेवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सकाळी तुळजापूर शहरातील सावरकर चौकातून काँग्रेसच्या वतीने मोटारसायकल ढकल मोर्चा काढला. हा मोर्चा बसस्थानक चौक, आंबेडकर चौक, भवानी चौक, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ मार्गे नेण्यात आला. मोर्चामध्ये पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. सदस्य धीरज पाटील, सभापती सचिन पाटील, अशोक मगर, भारत कदम, सुनील रोचकरी, राजेंद्र शेंडगे, शांताराम पेंदे, तानाजी जाधव, विनित कोंडो, लखन पेंदे, सीताराम शिंगे, आण्णाप्पा पवार, अविनाश रसाळ, शाहू मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.